शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
3
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
5
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
7
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
8
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
9
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
10
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
12
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स
13
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
15
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
16
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
17
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
18
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
20
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

वसई तालुक्यात पोलिस अपुरे

By admin | Published: May 19, 2016 4:00 AM

या तालुक्यात मोठया प्रमाणात लोकसंख्या वाढत असून ती ३ लाखाहून अधिक आहे.

सुनील घरत,

वसई/पारोळ- या तालुक्यात मोठया प्रमाणात लोकसंख्या वाढत असून ती ३ लाखाहून अधिक आहे. या तालुक्यात १ हजार ९८७ लोकांच्या सुरक्षेसाठी १ पोलिस अशी दयनीय अवस्था आहे वसईत परप्रांतियांचे वाहते लोंढे, कोणत्याही ओळखीपाळखीशिवाय राहत असलेले गुन्हेगारीवृत्तीचे लोक, नालासोपारा पूर्वेकडील संतोषभुवन, धानिवबाग, पेल्हार, वाकणपाडा, नवजीवन, वसईफाटा हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जात असून या भागात सहजपणे कायदा हातात घेतला जात आहे. वाढती गुन्हेगारी, अल्पवयीन मुलींचे अपहरण, व्यापाऱ्याच्या हत्या, चैन स्रॅचिंग, चोरी, दरोडे, या सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने वसई तालुक्यातील पोलिस यंत्रणा अधिक बळकट करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते/नगरसेवक धनंजय गावडे यांनी राज्योच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.वसई तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नालासोपारा, तुळींज, वालीव, माणिकपूर, विरार या पोलिस ठाण्यातील बल वाढवण्यात यावे, रिक्त पदे तातडीने भरणे, अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्याच्या निवासाचीसोय करणे, पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे, पोलिसांना आवश्यकतेनुसार अत्याधुनिकशस्त्रे, साधनसामुग्री, व वाहन पुरवणे, गुप्तचर यंत्रणा अधिक बळकट करणे हया मागण्यांचे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिल्याचे धनंजय गावडे यांनी लोकमतला सांगितले. वसई-विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे, हा प्रस्ताव अनेक वर्षे पडून आहे. तसेच नव्याने वाढलेल्या परिसरासाठी सुचविलेली नवीन पोलीस ठाणीही लालफितीत आहे. या दोन गोष्टी झाल्या तरच पोलीस बळ वाढेल. अन्यथा, स्थिती जैसे थे राहिल.वसई तालुक्यात वसई, वालीव, विरार, माणिकपूर , अर्नाळा, नालासोपारा, बोळींज या पोलिस ठाण्यांचा समावेश असून या पोलिस ठाण्यामध्ये पोलिस बलही अपुरे आहे. तसेच दोन पोलिस ठाणी मान्यतेच्या प्रतिक्षेत आहेत. वसईतील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसबल व साधनसामुग्री अपुरी पडत असल्याने वसईत गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांपुढे आव्हान उभे राहत आहे.