शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
4
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
5
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
6
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
7
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
8
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
9
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
10
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
11
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
12
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
13
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
14
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
15
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
16
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
17
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
18
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
19
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
20
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 

राजकीय वैमनस्यातून हत्या, चौघांची जन्मठेप कायम

By admin | Published: August 05, 2014 1:00 AM

वर्धा जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून घडलेल्या थरारक हत्याकांडातील चार आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.

हायकोर्ट : वर्धा जिल्ह्यातील थरारक घटनानागपूर : वर्धा जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून घडलेल्या थरारक हत्याकांडातील चार आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. विजय ऊर्फ गुड्डू बाबाराव महाकाळकर (३४), विनोद जंगलू भाकरे (३४), देवानंद भरत महाकाळकर (३५) व शंकर गोविंद लांडगे (३५) अशी आरोपींची नावे आहेत. वर्धा सत्र न्यायालयाने या चारही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड, कलम १२०-ब अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड, तर कलम ३४१ अंतर्गत १ महिना कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तसेच, कलम १२०-ब अंतर्गतची शिक्षा भोगल्यानंतर अन्य कलमांतर्गतची शिक्षा एकाच वेळी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. सेवाग्राम पोलिसांनी एकूण १९ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयाने वरील चार आरोपी वगळता अन्य आरोपींना निर्दोष सोडले होते. अन्य आरोपींमध्ये राधेश्याम ओंकार महाकाळकर (२८), जंगलू गणपत भाकरे (५९), राजू बाबाराव महाकाळकर (२८), दिलीप पंढरी महाकाळकर (३०), संदीप यशवंत महाकाळकर (३२), सुरेश दौलत थोटे (५७), जानराव शंकर धांडे (४८), विलास नरसिंग महाकाळकर (४३), हृदयनाथ भाऊराव सोनटक्के (२६), नरसिंग विठोबा महाकाळकर (६७), विलास बाबुलाल पाहुणे (४३), यशवंत श्यामराव महाकाळकर (५२), भास्कर जंगलू भाकरे (५२), ज्ञानेश्वर उर्फ नाला नारायण काचोडे (४५) व रणजित वसंत शिंदे (४७) यांचा समावेश आहे. शेवटचे दोघे नालवाडी, तर इतर सर्व आरोपी महाकाळ (वर्धा) येथील रहिवासी आहेत. दोषी आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध, तर राज्य शासन व मृताची पत्नी अर्चना यांनी १५ आरोपींना निर्दोष सोडण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता तिन्ही अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.मृताचे नाव मकरंद टोंपे होते. खटल्यातील माहितीनुसार, महाकाळ गावात दोन राजकीय गट होते. टोंपे हे एका गटाचे नेतृत्व करीत होते. हा गट काही वर्षे सत्तेवरही होता. आरोपी दुसऱ्या गटाचे प्रतिनिधित्व करीत होते. शत्रुत्वामुळे दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतर ३१ आॅगस्ट २००७ रोजी सकाळी सातोडा गावातील शेतात टोंपे यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी त्याच दिवसी दोन प्रत्यक्ष साक्षीदारांचे बयान नोंदवून आरोपींना अटक केली होती. दोषी आरोपींविरुद्ध वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर, निर्दोष आरोपींतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा, शासनातर्फे एपीपी डी. बी. पटेल, तर अर्चना टोंगेंतर्फे व्ही. आर. मुंदडा यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)