शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

रुग्णांच्या दुर्दशेला सरकार जबाबदार

By admin | Published: January 08, 2016 2:46 AM

राज्य सरकारच्या उदासीन धोरणांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे;

मुंबई : राज्य सरकारच्या उदासीन धोरणांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे; शिवाय तेथील रुग्णालयात वैद्यकीय सेवांची वानवा आहे, असे म्हणत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीने राज्य सरकारवर ताशेरे ओढले; शिवाय नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला २ लाखांचा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डॉक्टरला १ लाखाचा तर अकोला आणि नंदुरबारमधील आदिवासी पाड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि जनस्वास्थ्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स येथील कन्व्हेन्शन सभागृहात आयोजित ‘राईट टू हेल्थ केअर’ या कार्यक्रमात आयोगाने ही माहिती दिली. आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीत महाराष्ट्रासाठी न्यायमूर्ती सिरियाक जोसेफ, राजस्थानमधील खटल्यांसाठी एस.टी. सिन्हा आणि गुजरातसाठी न्यायमूर्ती डी. मुरुगेसन यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात जननी शिशू योजनेची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट मत न्यायमूर्ती सिरियाक जोसेफ यांनी या वेळी मांडले. नंदुरबार जिल्ह्यातील अपघातग्रस्त सुरेश नाईक या तरुणाला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला. त्याला २ लाखांची भरपाई, सरकारकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि कृत्रिम पायाची व्यवस्था करण्याचे आदेश आयोगाने संबंधित डॉक्टरला दिले आहेत.पुण्यातील इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात शीतल बनकर गरोदर असताना तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यांची तपासणी करून एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असल्याचा चुकीचा अहवाल देण्यात आला. त्यांना १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले.अकोल्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने स्वाती वाघूरकर यांचे नवजात अर्भक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने दगावले. आयोगाने त्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्यास सांगितले. (प्रतिनिधी)