शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
3
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
4
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
5
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
6
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
7
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
8
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
9
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
10
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
11
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
12
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

Raju Shetti: स्वाभिमानी संघटना मोठा निर्णय घेण्याची शक्यता! राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 12:58 PM

Raju Shetti: विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत आमदार व्हायचे की नाही, याचाही निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) बेबनाव वारंवार समोर येत आहे. एकीकडे विरोधी पक्ष सातत्याने निशाणा साधत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कुरबुरही वाढताना दिसत आहे. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना दिसत आहेत. शेतकरी प्रश्नांवर आक्रमक झालेले राजू शेट्टी (Raju Shetti) आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

राज्यातील शेतकरी बांधवांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे राजू शेट्टी महविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच देण्यात आले आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत आमदार व्हायचे की नाही, याचाही निर्णय याच बैठकीत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

स्वाभिमानीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, खासगी कंपन्यांकडून सरकार वीज खरेदी करत नाही. दिवसा वीज द्यावी ही पक्षाची मागणी असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. महाविकास आघाडीला पाठींबा द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय ५ एप्रिल रोजी घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्य बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. राज्यात भविष्यात आघाडीचे राजकारण करायचे की नाही, याचादेखील गंभीर विचार या बैठकीत करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

दरम्यान, अलीकडेच दिल्लीत देशातील सर्वच शेतकरी संघटना बैठक झाली. शेतकऱ्यांना हमी भाव देणारा कायदा करुन घेण्यासाठी आता पुढचा लढा असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. हरभरा हमी भावपेक्षा कमी दरानं खरेदी केला जात आहे. ऊस तोडणी मजूर पेटवून ऊस तोडत आहेत. हे बरोबर नाही. हमी भावाच्या संदर्भात ०१ मे रोजी गावसभेत ठराव घेणार असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचे काय झाले? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीRaju Shettyराजू शेट्टी