शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

वीजपुरवठा बारा तास होणार अंमलबजावणीचे आदेश

By admin | Published: September 10, 2016 5:01 AM

पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.

मुंबई : पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा दिला जात असून, त्यासाठी महावितरणच्या यंत्रणेत आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना योग्य प्रकारे वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने क्षेत्रीय अभियंत्यांना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.मागील दोन-तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल शासनाने घेतली असून, पाण्याची आणि विजेची उपलब्धता असल्यामुळे कृषी फिडरवरील शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील कृषिप्राबल्य असलेल्या १६पैकी १३ परिमंडलांत कृषिग्राहकांना दरदिवशी १२ तास चक्राकार पद्धतीने थ्रीफेजची वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत महावितरणने क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना निर्देश दिले असून, त्यात तांत्रिक कारणांमुळे कुठे वीजपुरवठा करताना अडचणी आल्यास त्या तातडीने दूर करून १२ तास वीजपुरवठा मिळेल याची दक्षता घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)