शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

शेतक-यांचा संप वेदनादायी - पंकजा मुंडे

By admin | Published: June 01, 2017 1:29 PM

शेतक-यांचा संप वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

 ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 1 - शेतक-यांचा संप वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करुन योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याकडे लक्ष द्यावे लागेल. सरकार या संपाबाबत आत्मपरीक्षण करेल, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत. 
मुख्यमंत्री शेतक-यांबाबत सकारात्मक आहेत, असे सांगत पंकजा पुढेही असे म्हणाल्या की शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला आधार दिला पाहिजे.
 
कापसाला हमीभाव दिला. शेतक-यांना व्यापा-याला मध्यस्थी ठेवण्याचे सवय लागली असून ती तोडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असे सांगत यावेळी पंकजा यांनी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. 
 
(माधव भांडारींना पक्षाने महाराष्ट्राबाहेर निर्यात करावं - मनसे)
 
""कर्जमाफी दिल्याने शेतकरी आत्महत्या थांबतील याची शाश्वती नाही. कायमस्वरुपी उपाय राबवून शेतकरी स्वावलंबन करायचे असा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी ठेऊन आहे. तुरीच्या बाबतीत शेतक-याला खूप त्रास सहन करावा लागला. शेतकरी केंद्रीत विकास करण्याचा प्रयत्न असून सफल होण्यासाठी वाट पहावी लागेल. सरकारच्या योजना पोहोचाव्यात यासाठी संवाद यात्रा काढली आहे. याआधी खतासाठी या राज्यात गोळीबार झालेत. अशी परिस्थिती आज नाही"", असा दावाही त्यांनी यावेळी केला. 
(वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतलं 155 लिटर दूध)
हेलिकॅप्टरमधून शेततळी दिसतील
लोकं म्हणतात की मोदी घोषणा करीत आहेत. याआधी तर घोषणाही होत नव्हत्या. योजना लोकांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी असतात. सत्तेत आल्यावर पहिली दोन वर्ष घोषणांचीच असते. मागेल त्याला शेततळे याचा परिणाम आता दिसू लागला आहे. मराठवाड्यात हेलिकॉप्टरमधून फिरताना आता शेततळे दिसतील, असे विश्वास यावेळी पंकजा यांनी व्यक्त केला. 
 
टीका सहन करण्यासाठी संयम हवा
आमदार अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांशी बोलताना केलेली वक्तव्ये तसेच राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकारांबाबत केलेले विधान हे अहंकाराचे लक्षण आहे काय? असा प्रश्न विचारताच यावर पंकजा म्हणाल्या, ""राजकारण्यांनी अहंकारात राहू नये. अधिकारपदाचा मान राखून संवाद राखावा. परंतु टीका किती सहन करायची, याचीही मर्यादा आहे. अलिकडे राजकारण्यांना डिस्टर्ब करण्याचे प्रमाण वाढलंय"", असेही त्यांनी नमूद केले"". 
 
बीड रेल्वे मार्गासाठी प्रयत्नशील
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ३ जून रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परळीत येणार आहेत. मराठवाड्यासह नगर ते बीड मार्गे परळी या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न असणार आहे. बीडसाठी रेल्वे वाहतूक महत्त्वाची आहे. बीडमध्ये १९ किमी लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेशी संबंधीत उद्योग सुरु व्हावेत. पाणी कमी लागणारे उद्योग यावेत. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून मुलींसाठी नॅपकीनचे उत्पादन बचतगटांकडून करून घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राम विकासखाते सर्वाधिक योजना राबवित असल्याचा दावा त्यांनी केला.