शहरं
Join us  
Trending Stories
1
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
2
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
3
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
4
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
5
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
6
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
7
"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा
8
Manappuram Finance shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
10
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा
11
Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण
13
अंतरवाली सराटी बनलेय राजकीय आखाड्याचे केंद्रबिंदू; मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मध्यरात्री येताहेत राजकीय नेते
14
“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत
15
Salman Khan : जेव्हा 'लॉरेन्स'ने सलमान खानला सांगितलेला त्याचा फेव्हरेट हिरो; भाईजानचा 'तो' Video व्हायरल
16
नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम
17
११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?
18
"मी राजकारणात नक्कीच येणार, पण...", विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ता माळीचं मोठं वक्तव्य
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
20
खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...

“मनोज जरांगेंनी उपोषण करण्यापेक्षा...”; मराठा आरक्षणप्रश्नी प्रकाश आंबेडकरांचा मोठा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 2:18 PM

Prakash Ambedkar Maratha Reservation News: विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटलेली आहेत. त्यावर काँग्रेस काय कारवाई करणार, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Prakash Ambedkar Maratha Reservation News: सरकारला दिलेली महिन्याभराची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुढील दिशा स्पष्ट केली आहे. २० जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असून, हे उपोषण अधिक कठोर असेल, असे स्पष्ट करत मराठा आणि ओबीसी समाजातील तणावास छगन भुजबळ कारणीभूत आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच आपल्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना मोठा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने सगेसोयरे अध्यादेशाविरोधात भूमिका घेतली होती. संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा. सोयऱ्यांना आरक्षण ही मागणी असंवैधानिक / बेकायदेशीर आहे. सगेसोयरे यांना आरक्षण ही मागणी फक्त ओबीसी विरोधातील नाही, तर समस्त आरक्षणाच्या चौकटीला धक्का लावणारी आहे. या मागणीने आरक्षणाच्या मुख्य चौकटीलाच धोका निर्माण होतो, असे सांगत वंचित बहुजन आघाडीने याविरोधात एक ठराव केला. यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा...

मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा २८८ जागा लढवल्या पाहिजे. त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. आता त्यांनी २८८ जागांवर विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीसंदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशा आशयाचे पत्र द्यायचे असे सर्वपक्षीय बैठकीत ठरले होते. ते पक्ष सर्वांनाच पाठवायचे आहे. मात्र, अद्याप तरी वंचित बहुजन पार्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पत्र आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा आणि ते कधीपर्यंत पत्र पाठवणार आहेत हे सांगावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटलेली आहेत. तसेच महाविकास आघाडीमधील इतर पक्षाची मतेही फुटलेली आहेत. पाच मते काँग्रेसची फुटली आहेत आणि इतर दोघांची एक-एक मत फुटलेली आहेत. पण सात फुटलेल्या मतांचे खापर काँग्रेसवर फोडले जात आहे. काँग्रेसचे जे फुटलेले आमदार आहेत, त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार? याचा खुलासा केला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी