शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रकाश आंबेडकरांकडून आंबेडकरी विचारांना तिलांजली, सुशीलकुमार शिंदे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 16:53 IST

माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली.

सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. '' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे अभ्यास करून देशाला राज्यघटना दिली. मात्र डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली आहे,'' असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. तसेच ही आपली शेवटची निवडणूक आहे, असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमधील मतदारांना भावूक आवाहन केले. सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे अभ्यास करून देशाला राज्यघटना दिली. मात्र डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली आहे. प्रकाश आंबेडकर हे सेक्युलर मतांची विभागणी करण्यासाठी सोडलेले भाजपाचे पिल्लू आहे.'' असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. यावेळी सत्ताधारी भाजपाचाही शिंदे यांनी सत्ताधारी भाजपावरही टीका केली. भाजपाने सोलापूरमध्ये एकतरी प्रकल्प आणला आहे का, असा सवाल शिंदे यांनी विचारला. तसेच केवळ जातीय समीकरणे डोळ्यांसमोर ठेवून भाजपाकडून जयसिद्धेश्वर स्वामी यांनी उमेदवारी देण्यात आली असे, शिंदे म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्हिजन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे सोलापूरमध्ये आले होते तेव्हा येथील कापड उद्योगाबाबत भरभरून बोलले होते. मात्र या उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी त्यांनी काय केले? मोदींनी पाच वर्षांत  येथील एक मीटर तरी कापड खरेदी केले आहे का?  असा सवालही त्यांनी विचारला.  

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेsolapur-pcसोलापूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक