शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला; OBC मेळाव्यातून मांडली आरक्षणावर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 12:05 PM

अस्तित्वात असलेली जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच निर्णय राज्य सरकारला देता येतो असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

नांदेड - मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली आहे. मात्र ही मागणी अयोग्य असल्याचं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. नांदेडच्या ओबीसी मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली त्याचसोबत ओबीसी नेत्यांच्या भूमिकेला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबाही दिला. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगेंच्या निमित्ताने नवीन नेतृत्व पुढे येत असेल तर त्याचं आपण स्वागत केले पाहिजे. परंतु त्यांना सांगायला हवं, आमच्या ताटात येऊ नको. तुला वेगळं ताट हवं असेल तर आम्ही त्याला मदत करतो. कुठल्याही जातीचा ओबीसीत समावेश करण्याचा अधिकार राज्याला नाही. तो अधिकार केंद्र सरकारला आहे. त्याला संसदेची मान्यता घ्यावी लागते. शासनाला कुणालाही जात देता येत नाही. अस्तित्वात असलेली जात ही मागासवर्गीय आहे की नाही एवढाच निर्णय देता येतो. पण कुठल्यातरी नव्या जातीला जन्म देणे हा शासनाचा अधिकार नाही आणि तो घटनेने त्यांना दिलेला नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी जरांगे पाटलांनाही समजावून सांगितले आहे. जर तुम्ही राजकारणासाठी करत असाल तर फार चांगले आहे. कारण ही सडलेली नेतृत्व आहेत हे त्यांच्याही समाजाला न्याय देत नाही आणि आमच्याही समाजाला न्याय देत नाही. परंतु जरांगे पाटलांच्या निमित्ताने जर नवीन नेतृत्व पुढे येत असेल त्याला स्वागत केले पाहिजे. वेगळे ताट हवं तर मदत करतो. ओबीसीचे ताट आणि गरीब मराठ्यांचे ताट वेगळे आहे हे लक्षात घ्यावे. जसं SC-ST दोघांना आरक्षण आहे. तसं OBC चं आरक्षण ओबीसींना. जर दोन्ही ताट वेगळे राहिले तर महाराष्ट्रात आपण बदल घडवू शकतो. राज्यात चोरांचे नेतृत्व आहे. ते आपल्याला लुटतात तसं त्यांच्या समाजालाही लुटतात असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यात महागाई वाढलेली असताना मोदी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येकाच्या खात्यात पाचशे रुपये तरी टाकावेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपला एकाधिकारशाही आणायची असून ती पद्धत लोकशाहीसाठी घातक आहे. संविधानात काय चुकीचे आहे, याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप पुढे येत नाही. मी मोहन भागवत यांना भेटण्यासाठी वेळ मागितली, परंतु, ते चर्चा करायला देखील तयार नसल्याचे आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर