शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
7
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
8
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
9
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
10
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
11
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
12
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
13
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
14
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
15
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
16
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
17
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
18
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
19
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
20
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

वंचित आघाडीच बहुजनांना सत्तेपासून वंचित ठेवणार; रामदास आठवलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 4:06 PM

रामदास आठवले यांचा आरोप. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘प्रयोगा’चा युतीलाच थेट लाभ मिळणार असल्याचे मत

- सुरेंद्र राऊत  यवतमाळ : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचित बहुजन आघाडी स्थापन करून नवीन राजकीय प्रयोग केला. मात्र, या आघाडीमुळे बहुजन समाजच सत्तेपासून वंचित राहणार आहे. या आघाडीचा थेट लाभ भाजपा-शिवसेना महायुतीला होणार असल्याचा आरोप रिपाइंचे (ए) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. 

आठवले यवतमाळात मुक्कामी होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. आठवले म्हणाले, आमचा युतीला उघड पाठींबा आहे. तर आंबेडकर छुप्या पद्धतीने युतीची मदत करीत आहेत. रिपाइं आठवले गटाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीच्या उमेदवाराचा तन-मन-धनाने प्रचार करणार आहे. यवतमाळात प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालीच विदर्भातील नाराज रिपाइं पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात त्यांनी मान-सन्मान मिळत नसल्याने महायुतीत राहण्याबाबतचा फेरविचार केला जावा, अशी मागणी केली. 

याकडे आठवलेंचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, या सर्व नाराज रिपाइं कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून नाराजी दूर केली जाईल. रिपाइं कार्यकर्ते प्रतिकुल परिस्थितीतही एकदिलाने काम करतील. वंचित आघाडीमुळे  काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे मत विभाजन अटळ आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची मतेच ‘मायनस’ होणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम