शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

प्राणहिता, गोदेचे पाणी पळविणार

By admin | Published: September 15, 2015 1:19 AM

सिरोंचा तालुक्याच्या सीमेजवळ प्राणहिता व गोदावरी नदीतीरावर नवा सिंचन प्रकल्प सुरू करण्याच्या उद्देशाने तेलंगण सरकारने विशेष हवाई सर्वेक्षण केले आहे. इचमपल्ली प्रकल्प पुनर्जीवित

- अभिनय खोपडे,  गडचिरोलीसिरोंचा तालुक्याच्या सीमेजवळ प्राणहिता व गोदावरी नदीतीरावर नवा सिंचन प्रकल्प सुरू करण्याच्या उद्देशाने तेलंगण सरकारने विशेष हवाई सर्वेक्षण केले आहे. इचमपल्ली प्रकल्प पुनर्जीवित करण्याच्या तेलंगण सरकारच्या हालचालीमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहेत.तेलंगणने चार ते पाच वर्षांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमांना लागून तेलंगण राज्यात तुमडीहेटी गावाजवळ विशालकाय चव्हेला सिंचन प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील सहा ते सात तालुक्यांचे शेती सिंचनाचे पाणी पळविले जाणार आहे. आतापर्यंत ५०० कोटी रुपयांचा खर्च तेलंगणने या प्रकल्पावर केला आहे.तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात भाजपा नेत्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मात्र आता सत्तेवर आल्यानंतर हा विरोध थंड पडला आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प घोषित करावा म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी केंद्रीयमंत्री उमा भारती यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली, अशीही माहिती पुढे आली आहे. हे सर्व सुरू असतानाच महाराष्ट्राच्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेलगत शुक्रवार व शनिवारी तेलंगण सरकारकडून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने कालेश्वर भागातील गोदावरी तीरावर कोटापल्ली, महादेवपूर, कालेश्वर या भागात हवाई सर्वेक्षण करण्यात आले. शुक्रवारी ११ सप्टेंबरला चार ते पाच हवाई फेऱ्या करण्यात आल्या; तर शनिवारी १० ते १५ हवाई फेऱ्या तेलंगणा व महाराष्ट्र सीमेलगत गोदावरी नदी भागात झालेल्या आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये तेलंगणा सरकारच्या जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते व त्यांनी या भागात प्राणहिता व गोदावरी नदीच्या पाण्यावर नवीन सिंचन योजना निर्माण करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण केले, अशी माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टरच्या अधिक फेऱ्या सिरोंचा तालुक्याच्या लगत झाल्यामुळे काही नागरिकांनी आदिलाबादच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी हवाई सर्वेक्षण होत असल्याला दुजोरा दिला, अशी माहितीही मिळाली आहे.बाबा आमटे यांनी केला होता विरोधसिरोंचा तालुक्याला लागून १९८०-८५ मध्ये इचमपल्ली धरण निर्माण करण्याचा प्रयत्न तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारने केला होता. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी या प्रकल्पाला कठोर विरोध केला. त्यामुळे हा प्रकल्प थंडबस्त्यात टाकण्यात आला होता. आता पुन्हा इचमपल्ली प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. अमरिशराव आत्राम यांचे मौनकाँग्रेस आघाडी सरकारच्या काळात चव्हेला-प्राणहिता या महाकाय सिंचन योजनेला नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष व राज्याचे विद्यमान आदिवासी विकास राज्यमंत्री अमरिशराव आत्राम यांनी कठोर विरोध होता. मात्र आता ते या प्रश्नावर मौन बाळगून आहेत.