शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

सार्वजनिक वाहतूक सुधारण्यास प्राधान्य - राज्य सरकार

By admin | Published: January 29, 2016 1:59 AM

मुंबईतील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी सम-विषम प्रयोग करण्यापूर्वी सार्वजनिक वाहतूक प्रणाली सुधारणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला सांगितले.

मुंबई : मुंबईतील वाहनांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी सम-विषम प्रयोग करण्यापूर्वी सार्वजनिक वाहतूक प्रणाली सुधारणे आवश्यक आहे, असे राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला सांगितले.मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे काहीही निर्णय घेण्यापूर्वी सरकारला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि त्याची क्षमता वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे, असे या केसमधील विशेष सरकारी वकील एस. के. नायर यांनी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठाला सांगितले.उपनगरीय लोकलची क्षमता १,६०० असताना पिक अवरमध्ये याच लोकमधून ४,७०० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. तर बेस्टच्या प्रत्येक चौ. मी वर १२ प्रवासी उभे असतात. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर दुप्पट ताण पडत असल्याची बाब अ‍ॅड. नायर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता कशी वाढवण्यात येईल, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांच्या दोन समित्या नेमण्यात आल्या आहेत, असे म्हणत या समित्यांचा अहवाल सादर करण्यासाठी अ‍ॅड. नायर यांनी काही दिवसांची मुदत खंडपीठाकडून मागून घेतली.मुंबईतील वाढती वाहन संख्या आणि त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सरकारी वकीलांनी वरील माहिती खंडपीठाला दिली. त्याशिवाय दिल्लीप्रमाणे मुंबईतही ‘सम-विषम’ नंबर असलेल्या वाहनांचा प्रयोग करून पहावा, अशी मागणी करणारी जनहित याचिकाही सामाजिक कार्यकर्ते शदाब पटेल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वायु प्रदूषण कमी व्हावे, यासाठी याचिका दाखल केली आहे.तर दुसरी याचिका बॉम्बे एन्वॉयरोन्मेंट अ‍ॅक्शन ग्रुप या एनजीओने १९९९ मध्ये दाखल केली आहे. मुंबईवरील रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येला आळा बसावा, यासाठी व्ही. एम. लाल समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी या समितीने उच्च न्यायालयात नोटीस आॅफ मोशन दाखल केले. हायकोर्टाने या याचिकांवरील सुनावणी ९ फेब्रुवारी रोजी ठेवत वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी काय पावले उचललीत आणि यापुढे कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार? ही माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. (प्रतिनिधी)