शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शरद पवारांना शह देण्याची तयारी, राज्यभरात अजित पवार गटाची मोर्चेबांधणी, केली मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 23:21 IST

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांना शह देऊन राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटानं मोठं पाऊल उचललं आहे.राज्यात पक्ष संघटना वाठवण्यासाठी राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली असून, एका पत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे.

या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि अहमदनगर जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर धनंजय मुंडे यांच्याकडे बीड, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची जबाबदारी असेल.  अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल पाटील यांच्याकडे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धर्मारावबाबा आत्राम यांच्याकडे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार