शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 12:26 IST

उद्धव ठाकरे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून याठिकाणी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधत निवडणुकीचा तयारी आढावा घेणार आहेत. 

नागपूर - लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या जागा कमी निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या जागा स्ट्राइक रेटप्रमाणे जास्त निवडून आल्या आणि झीरो सदस्य असलेल्या काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आल्या त्यामुळे थोडंस कळत नकळत उद्धव ठाकरे दबावात आल्याचे दिसतात. मात्र कुणीही २०१९ विसरू नये असा गर्भित इशारा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे. कळमेश्वर तालुक्यात आज उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या उद्धाटनाला येणार आहेत. या निमित्ताने पूर्व विदर्भातील विधानसभा निवडणुकीचा तयारी आढावा ठाकरेंकडून घेण्यात येत आहे. याठिकाणचे इच्छुक उमेदवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे. उद्धव ठाकरेंकडून संभाव्य उमेदवारांना संकेत द्यावेत यासाठी माझा आग्रह असणार आहे असं संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी सांगितले.

माध्यमांना मुलाखत देताना भास्कर जाधव म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीतील चर्चेला बाधा येईल असं मी बोलणार नाही परंतु काँग्रेस, नाना पटोले काय म्हणतात याकडे मी बघत नाही. माझा पक्ष काय सांगतो, माझ्या पक्षाची ताकद या भागात किती आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करायला बैठकीला तयार आहे. १९९० ते २०१९ पर्यंत पूर्व विदर्भ भागात शिवसेनेचे किती निवडून आलेत याचा सगळा मी अभ्यास केला आहे. त्या त्या वेळचे सर्व लांब असलेले लोक मी जवळ केलेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद किती उभी राहिलीय हे काही पक्षांना माहिती नसावं म्हणून ते तशी विधाने करत असतील असं सांगत त्यांनी नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी एकही जागा मित्रपक्षाला सोडणार नाही या पटोलेंच्या विधानावर आक्षेप घेतला. 

तसेच नाना पटोले काय म्हणतायेत, त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. नाना पटोलेंचा अभ्यास कमी असेल. या १२ मतदारसंघात शिवसेना अस्तित्वात आहे, त्यांना जर शिवसेना दिसत नाही तर हा त्यांचा भ्रम आहे. नागपूर जिल्ह्यातील न्यायिकदृष्ट्या शिवसेना-भाजपानं २०१९ मध्ये १४ जागा जिंकल्या होत्या. भलेही आज आम्ही एकत्र नसू पण नैतिकतेने पूर्व विदर्भातील २८ पैकी १४ जागांवर आमचा दावा कायम राहणार आहे. विदर्भातील ६२ जागा आहेत त्यापैकी २८ जागांचा संपर्क नेता मी आहे. उर्वरित जागा खासदार अरविंद सावंत यांच्याकडे आहेत. ते किती जागा मागतायेत यावर चर्चा नाही परंतु मी माझ्या कार्यक्षेत्रातील १४ जागा मागतोय. नागपूर आणि रामटेक मिळून १२ जागा आहेत त्यातील किमान ४ जागा मिळायलायच हव्यात. पक्षातंर्गत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावे हा आमचा आग्रह राहणार आहे. कारण विदर्भातील संपर्क नेता म्हणून इथल्या जनतेशी तळमळ, विदर्भातील जनतेशी भावना, पक्षाचे जे पदाधिकारी, सहकारी आहेत त्यांच्यात शिवसेना काय आहे, विदर्भातील लोकांना शिवसेना का हवीय हे मी अनुभवतोय. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे मी आग्रह धरणार आहे तुम्ही अंतर्गत सांगा, जाहीर सांगितले नाही तरी चालेल असा आग्रह भास्कर जाधव उद्धव ठाकरेंकडे करणार आहेत. 

दरम्यान, ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा काँग्रेसची राज्यात एकही जागा नव्हती. बाळू धानोरकर जे निवडून आले होते दुर्दैवाने त्यांचे निधन झाले होते. शरद पवारांच्या गटाचे ४ खासदार होते, त्यातील १ तिकडे गेले ३ पवारांसोबत राहिले. उद्धव ठाकरेंच्या १८ जागा निवडून आल्या होत्या परंतु त्यातील ६ खासदार ठाकरेंसोबत राहिले. लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या जागा कमी निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या जागा स्ट्राइक रेटप्रमाणे जास्त निवडून आल्या. आणि झीरो सदस्य असलेल्या काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आल्या त्यामुळे थोडंस कळत नकळत उद्धव ठाकरे दबावात आल्याचे दिसतात. मात्र दबावात येण्याची गरज नाही कारण उद्धव ठाकरेंमुळेच महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्यात हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र तेच बघतोय. तुम्ही कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न जरूर करा परंतु कमी जागा घेण्याचा विचार करण्याची गरज नाही. २०१९ ला उद्धव ठाकरेंच्या जागा जास्त होत्या, त्याखाली राष्ट्रवादी आणि त्यानंतर काँग्रेस होती. आज लोकसभेला काँग्रेसच्या जागा वाढल्या त्यामुळे ते १२ पैकी एकही जागा देणार नाही अशी भाषा करतायेत. २०१९ कुणीही विसरू नये हे मला काँग्रेसला सांगायचे आहे असा गर्भित इशारा भास्कर जाधव यांनी काँग्रेसला दिला.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBhaskar Jadhavभास्कर जाधवcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४