शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

‘डाळीची भाववाढ हा तर सुनियोजित कट’

By admin | Published: January 20, 2016 2:32 AM

दिवाळीच्या काळात डाळींच्या विशेषत: तूरडाळींच्या दरात झालेली प्रचंड भाववाढ एका सुनियोजित कारस्थानाचा भाग होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट

मुंबई : दिवाळीच्या काळात डाळींच्या विशेषत: तूरडाळींच्या दरात झालेली प्रचंड भाववाढ एका सुनियोजित कारस्थानाचा भाग होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना या प्रकाराची माहिती होती, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.अन्न व नागरी पुरवठा तेलबिया व खाद्यतेलावरील निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये डाळींचा समावेश नव्हता. परंतु, निर्णय घेताना त्यामध्ये अचानक डाळींचा समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना या प्रकाराची संपूर्ण कल्पना होती व या प्रस्तावावर त्यांच्यादेखील स्वाक्षरी आहेत. डाळींवरील निर्बंध मागे घेताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होती. परंतु, केंद्र व राज्यातील मोठ्या नेत्यांच्या प्रभावामुळे ही परवानगी घेण्याची अट नियमबाह्य पद्धतीने शिथिल करण्यात आली. निर्बंध मागे घेणे हे एक व्यापारी कारस्थान होते आणि भारतीय जनता पार्टीचा केंद्रातील एक वरिष्ठ नेता या कटात सामील होता, असा आरोपही सावंत यांनी केला. डाळ भाववाढीचे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीपोटी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी त्यांच्याच विभागाचे सचिव दीपक कपूर यांना ४ पानांचे पत्र लिहून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी कितीही सावरासावर केली तरी ते या प्रकारातून अंग काढू शकत नाहीत. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनीतर डाळींचे साठे असलेल्या एका गोदामालाही भेट दिली. ही भेट पाहणीचा प्रकार नव्हता तर त्यामागेही मोठे गुपित आहे. पुरेशी कागदपत्रे जमा झाली की त्याचाही गौप्यस्फोट आपण करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)