शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

खासगी वाहनांना आवरा!

By admin | Published: February 09, 2016 4:21 AM

खासगी वाहनांमुळे एसटी महामंडळाला वर्षाला २०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची बाब गांभीर्याने घेत उच्च न्यायालयाने सोमवारी, एसटी स्टॅण्डच्या २०० मीटर

मुंबई : खासगी वाहनांमुळे एसटी महामंडळाला वर्षाला २०० कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची बाब गांभीर्याने घेत उच्च न्यायालयाने सोमवारी, एसटी स्टॅण्डच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना मनाई करण्याचे आदेश सरकारला दिले. तसेच नियम तोडल्यास संबंधित वाहनांचे परमिट रद्द करा. अशा वाहनांवर कठोर कारवाई करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने एसटी महामंडळालाही (एमएसआरटीसी) धारेवर धरले. ‘तुमच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी तुम्ही काही पावले का उचलत नाहीत? बस खूप खराब असतात. आसने व्यवस्थित नसतात. त्याचप्रमाणे बस स्टॅण्डवरील कॅन्टीनची दुर्दशा असते. चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ मिळत नाहीत,’ अशा शब्दांत खंडपीठाने एमएसआरटीसीची कानउघडणी केली. मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकात उपलब्ध असलेल्या वाय-फाय सुविधेचा दाखला देत खंडपीठाने म्हटले की, एमएसआरटीसीनेही प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बस स्टॅण्डवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करावी. प्रवासी खासगी बसने प्रवास करणे पसंत करतात. तुम्हीही चांगल्या सुविधा द्या. एसी बस, चांगली आसने, वाय-फाय सुविधा आणि चांगले कॅन्टीन उपलब्ध करून द्या. एखाद्या ठिकाणी पथदर्शी प्रकल्प करून पाहा, अशी सूचना खंडपीठाने एमएसआरटीसीला केली. ...अन्यथा कठोर कारवाई कराएमएसआरटीसीच्या वकिलांनी एसटी स्टॅण्डच्या २०० मीटर परिसरात अद्यापही खासगी वाहने दिसून येत असल्याची माहिती खंडपीठाला दिली. खासगी वाहनांच्या चालकांचा परवाना आहे की नाही, हे तपासण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याचा आदेश सरकारला दिला.‘राज्यात एवढ्या मोठ्याप्रमाणावर बेकायदेशीर वाहने चालतात. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रवास करतात. मात्र या चालकांकडे साधा परवानाही नसतो. त्यांना वाहन चालवण्याचे नीट प्रशिक्षण मिळाले आहे की नाही, हे सुद्धा माहित नसते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. वाहनांचा इन्शुरन्सही नसतो. यामध्ये प्रवाशांचेच नुकसान होते. खासगी वाहनांमधून प्रवास केल्याने काय नुकसान होऊ शकते, यासंदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करा, ’ असे म्हणत खंडपीठाने गेल्यावर्षी राज्यात किती अपघात झाले, याची माहिती पुढील सुनावणीवेळी देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.एसटीला सहन करावे लागत असलेले आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी सरकारने पुरेशी पावले उचलल्याची माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला दिली. खासगी बसमध्ये एसीची सुविधा असते, आणि त्यांच्याकडे तिकिटांचे दर कमी-जास्त करता येतात म्हणून प्रवासी खासगी बसने प्रवास करणे पसंत करतात. तुम्हीही चांगल्या सुविधा द्या. एसी बस, चांगली आसने, वाय-फाय सुविधा आणि चांगले कॅन्टीन उपलब्ध करून द्या.