शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

मराठा आरक्षण पटलावर आणण्यासाठी प्रक्रिया सुरू; राज्य सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 03:06 IST

मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग समितीने सादर केलेला अहवाल विधासभेत पटलावर आणण्यासाठी कॅबिनेटने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती मुख्य सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला बुधवारी दिली.

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग समितीने सादर केलेला अहवाल विधासभेत पटलावर आणण्यासाठी कॅबिनेटने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती मुख्य सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला बुधवारी दिली.मागास प्रवर्ग समितीने काही शिफारशी केल्या असून राज्य सरकारने १८ नोव्हेंबर रोजी त्या सर्व शिफारशी मान्य केल्या आहे. त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाला सांगितले.मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी मगास प्रवर्ग आयोगाला जलदगतीने अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांच्या या याचिकेवरील सुनावणीत ७ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाने आयोगाला जलदगतीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, आयोगाने १५ नोव्हेंबर रोजी सरकारपुढे अहवाल सादर केला.ही मागणी पूर्ण झाल्याने, ही याचिका निकाली काढण्यास आमची हरकत नाही, असे याचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांनी न्यायालयाला सांगितले.त्यांचे म्हणणे मान्य करत उच्च न्यायालयाने या याचिकेत काही उरले नाही, असे म्हणत ही याचिका निकाली काढली. तसेच राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारला असून त्यावर कायदेशीर व संविधानिक कार्यवाही सुरू आहे, असे उच्च न्यायालयाने निकालात नमूद केले. ही बाब सरकाच्या उशिरा लक्षात आल्याने हे प्रकरण दुपारी तीन वाजता न्यायालयापुढे सुनावणीसाठी आणण्यात आले. त्यावेळी सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी राज्य सरकारने अहवाल स्वीकारला नसून त्यातील केवळ शिफारशी स्वीकारल्या आहेत आणि अहवालावर कायदेशीर आणि संविधानिक कार्यवाही सुरु आहे, असे निकलात म्हणावे, अशी विनंती न्यायालयाला केली.न्यायालयाने पाच वाजता याचिकाकर्त्यांचे वकील व रवी कदम यांना एकत्र बोलावून निकालात दुरुस्ती केली.राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकरीमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा २०१४ मध्ये निर्णय घेतला. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या व समर्थन करणाºया अनेक याचिका २०१४ व २०१५ मध्ये दाखल करण्यात आल्या. न्यायालयाने नोंव्हेंबर २०१४ मध्ये शासनाच्या या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली.मात्र, दीड-दोन वर्ष उलटूनही या याचिकांवर सुनावणी न झाल्याने विनोद पाटील यांनी मागस प्रवर्ग आयोगाने याबाबत जलदगतीने निर्णय घ्यावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.१८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला ‘सामाजिक व शैक्षणिख मागास प्रवर्ग’ या नव्या श्रेणीअंतर्गत आरक्षण देईल, असे जाहीर केले. मात्र, मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मराठा समाजाने १६ टक्केच आरक्षण द्यावे, असा आग्रह धरला आहे.तर मंगळवारी महसूल उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागास प्रवर्गाचा अहवाल विधासभेत पटलावर आणण्यापूर्वी विधितज्ज्ञांचे मत घेण्यात येईल, असे म्हटले होते....तर पुन्हा याचिका सादर करण्याची मुभान्यायालयाने याचिकाकर्त्यांना अहवाल पटलावर मांडून सार्वजनिक केल्यावर त्याबद्दल काही तक्रारी असल्यास त्यांना पुन्हा याचिका सादर करण्याची मुभा दिली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण