शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

केंद्राच्याच धर्तीवर कुलगुरू निवडीची प्रक्रिया प्रस्तावित; राज्यपालांच्या अधिकारावर टाच आणली नाही - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 7:23 AM

राज्यपालांचे अधिकार काढलेले नाहीत किंवा त्यांच्या अधिकारांवर टाच आणलेली नाही, उदय सामंत यांची माहिती.

मुंबई : केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्य सरकारने कुलगुरू निवडीची प्रक्रिया प्रस्तावित केली आहे. तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून राज्यपालच कुलगुरूंची निवड करणार आहेत. शिवाय, प्र-कुलपतीसुद्धा समन्वयासाठी असणार आहेत. त्यामुळे राज्यपालांचे अधिकार काढलेले नाहीत किंवा त्यांच्या अधिकारांवर टाच आणलेली नाही, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

राज्य मंत्रिमंडळाने नुकतेच प्र-कुलपतीपदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची नियुक्ती तसेच कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नावांची राज्यपालांना शिफारस करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. यावर भाजपने टीका केली. युवासेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये आता कुलगुरू निवडला जाणार, एखादा सचिन वाझेसारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का, मुंबई विद्यापीठाचे भूखंड लाटण्यासाठी विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचा घाट ठाकरे सरकारने घातला आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. यावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. केंद्र सरकार ज्या पद्धतीने केंद्रीय विद्यापीठांमध्ये नियुक्ती करते तशीच पद्धत आता प्रस्तावित केली आहे. 

मी एकमेव मंत्रीशिक्षण धोरणाची अंमलबजावणी करताना राज्यपाल, सरकार आणि विद्यापीठ या सर्वांमध्ये योग्य समन्वय हवा यासाठी निर्णय घेतले. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये अशीच पद्धत आहे. महाराष्ट्रात निर्णय घेतला की टीका करण्याचे उद्योग काही जण करतात. विद्यापीठांचे भूखंड शैक्षणिक कारणासाठी वापरले जावेत यासाठी एसआरए प्रकल्प बंद करणारा मी एकमेव मंत्री आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतMaharashtraमहाराष्ट्र