शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

चळवळीतून साहित्याची निर्मिती

By admin | Published: January 19, 2016 1:39 AM

चळवळी याच साहित्यनिर्मितीचा आधार असतात. पण, या दोन्ही वाटा आता वेगवेगळ्या दिशेने चालल्या आहेत. सर्वांना मिळुन जातीविहीन समाज निर्माण करायचा आहे

प्रज्ञा केळकर-सिंग, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)चळवळी याच साहित्यनिर्मितीचा आधार असतात. पण, या दोन्ही वाटा आता वेगवेगळ्या दिशेने चालल्या आहेत. सर्वांना मिळुन जातीविहीन समाज निर्माण करायचा आहे. त्यामुळे दलित आणि ग्रामीण साहित्य असा भेदाभेद न करता, सर्वांनी मिळुन साहित्याची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.सर्वसमावेशक विकास समाजाला एकत्र आणेल आणि त्यातुन सकस साहित्यनिर्मिती होइल, असा आशावाद परिसंवादामध्ये वक्तांनी व्यक्त केला. येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बदलते सामाजिक-राजकीय अस्तित्व आणि दलित व ग्रामीण साहित्य या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. दत्ता भगत अध्यक्षस्थानी होते.परिसंवादात अतुल लोंढे, प्रकाश खरात, डॉ. रा.रं.बोराडे, प्रा. शेषराव मोहिते, विनय कोरे, शेखर गायकवाड आदिंनी सहभाग नोंदवला. सर्वांनी सहित्य संमेलनाच्या नियोजनाचे भरभरुन कौतुक केले. या संमेलनाने यापुढील संमेलनांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे, असेही मत या वेळी मांडण्यात आले.खरात म्हणाले, ‘‘ नकार, विद्रोह आणि मानवता ही दलित सहित्याची त्रिसुत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात अभुतपुर्व जाग्रुती केली. मात्र, आता जीवनचे संदर्भ बदलले आहेत. दलित साहित्याच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मोहिते म्हणाले, ‘‘ अर्थकारण हा सामाजिक आणि राजकीय बदलाचा पाया आहे. सकारात्मक राजकीय परिवर्तनाचा लाभ केवळ शहरी भागाला झाला. ग्रामीण भागाला मात्र जाणीवपुर्वक वंचित ठेवण्यात आले आहे. शेतक- यांच्या आत्महत्याकडे अत्यंत असंवेदनशीलतेने पाहिले जाते. हे सर्व चित्र ग्रामीण साहित्यामध्ये पहायला मिळते.आजकाल दलित साहित्यिक स्वतला दलित म्हणवून घेत नाहीत. दुसरीकडे या साहित्यिकांना एका चौकटीत बसवण्याचे, त्यांची अवहेलना करण्याचे काम समाजाकडुन केले जाते. शेखर गायकवाड म्हणाले, प्रशासकीय काम करताना ग्रामीण जीवनाचे अनेक पदर अनुभवायला मिळतात. वास्तव,भाषा, संस्कृती झपाट्याने बदलत आहे. या बदलाचे प्रतिबिंब साहित्यावर पडायला हवे.कोरे म्हणाले, ‘‘ समाजरचना बदलण्याचे काम सहकार चळवळीने केले. मात्र, या चळवळीवर सकारात्मक पद्धथीने झालेले लिखाण अपवादात्मक रितीनेच पहायला मिळेल. बदलती सामाजिक, राजकीय व्यवस्था लक्षात घेता भविष्यात साहित्यिकांना मोठे योगदान द्यावे लागणार आहे.भगत यांनी समाजातील बदलावर नेमके भाष्य केले. ते म्हणाले, समाज बदलत आहे. माणुस नव्याने विचार करु लागला आहे. आता यापुढे जाउन जातीभेद नष्ट करण्याची, त्यासाठी साहित्यातुन जाग्रुती करण्याची गरज आहे. वैज्ञानिक आव्हाने पेलण्याचे बौध्दिक सामर्थ्य समाजात निर्माण करण्याची गरज आहे. पुरुषोत्तम काळे यांनी सूत्रसंचालन केले.