शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

प्राध्यापक गजाआड

By admin | Published: March 20, 2016 3:08 AM

बारावीची उत्तरपत्रिका ३५ हजार रुपयांत सोडवून देणारे रॅकेट पाच वर्षांपासून सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. शनिवारी पहाटे या प्रकरणात अंबड तालुक्यातील शेवगा

- राजेश भिसे / गंगाराम आढाव / गजानन वानखेडे,  जालनाबारावीची उत्तरपत्रिका ३५ हजार रुपयांत सोडवून देणारे रॅकेट पाच वर्षांपासून सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. शनिवारी पहाटे या प्रकरणात अंबड तालुक्यातील शेवगा येथून एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. याशिवाय घनसावंगी तालुक्यातील रांजणीच्या प्राध्यापकावरही संशय असून त्याच्यावर पाळत ठेवली जात आहे.या रॅकेटमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून बोर्डातील अधिकाऱ्यांपासून संबंधित परीक्षा केंद्रप्रमुखापर्यंत सर्वांचीच चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जालना पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा कन्नड (जि. औरंगाबाद) तालुक्यातील पिशोर येथील योगीराज महाविद्यालयाचा प्राचार्य ज्ञानेश्वर सोनवणे आणि जालन्यातील संस्कार निवासी वसतिगृहाचा व्यवस्थापक श्रीमंत वाघविरुद्ध गुन्हा नोंदवून वाघला अटक केली. सोनवणे मात्र पसार झाले. तसेच संस्कार वसतिगृहावर पोलिसांनी छापा टाकून अडीचहजार लिहिलेल्या आणि पाच हजार कोऱ्या उत्तरपत्रिकांसह होलोक्राफ्ट जप्त केले होते. श्रीमंत वाघ व अशोक पालवे या दोघांना शनिवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.शनिवारी अटक केलेला अशोक पालवे हा रोहिलागड येथील जांबुवंत महाविद्यालयात प्राध्यापक असून पाच वर्षांपासून पालवे हा विद्यार्थ्यांना बारावी पास करण्याची हमी देऊन आपल्या महाविद्यालयात प्रवेशदेत होता. यासाठी तो ठरावीकरक्कम घेत असल्याची माहिती हाती आली आहे.पास होण्याची हमी संस्कार निवासी वसतिगृहात बारावी पासची हमी देऊन प्रवेश दिला जात असे. वसतिगृहावर शुक्रवारी रात्री छापा टाकल्यानंतर यासंदर्भातील सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. अजूनही विद्यार्थी तेथे आहेत, असे साहाय्यक पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम म्हणाले.या वसतिगृहात काही वर्षांपूर्वी गुरूकुलच्या धर्तीवर शिक्षण देण्यात येत असे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांकडून ठरावीक शुल्क घेऊन त्यांच्या राहण्याची, जेवणाची, अभ्यासाची सोय करतानाच या विद्यार्थ्यांना शंभर टक्के पासची हमी देण्यात येत असे.१२ प्राचार्यांवर संशयउत्तरपत्रिका लिहून देणाऱ्या रॅकेटमध्ये जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास १२ प्राचार्य असल्याचा संशय आहे. या प्रकरणासंदर्भात माहिती घेण्यासाठी परीक्षा मंडळ बोर्डाचे अध्यक्ष सुखदेव ढेरे शनिवारी सकाळी जालन्यात दाखल झाले. तालुका पोलिसांकडून त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. तसेच जप्त करण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांचीही पाहणी केली. या प्रकरणात जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील १० ते १२ महाविद्यालयांचे प्राचार्य असल्याचा संशय ढेरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. बोर्डाचे यूआयडी कोड नंबर बघून सापडलेले कोड हे कोणत्या शाळेकडे गेले होते, त्याचा शोध घेतला जाईल. त्यानंतरच उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात येईल. याचा बारावीच्या निकालावर कुठलाही परिणाम होणार नाही. नियोजित वेळेवरच बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, असे ढेरे यांनी सांगितले.