शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पुनर्वसनाने दिली नक्षलींच्या आत्मसमर्पण योजनेला गती

By admin | Published: October 13, 2015 2:54 AM

जंगलातील नक्षली जीवनाला कंटाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्यांचे पुनर्वसन वेगवान पद्धतीने करण्यावर गडचिरोली पोलिसांनी भर दिल्याने

गडचिरोली : जंगलातील नक्षली जीवनाला कंटाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्यांचे पुनर्वसन वेगवान पद्धतीने करण्यावर गडचिरोली पोलिसांनी भर दिल्याने, अनेक आत्मसमर्पित नक्षलवादी आता भाजी दुकानदार, चहाविक्रेते, सायकल दुरुस्ती, नळ फिटिंग करण्याचा व्यवसाय करताना दिसत आहेत. पुनर्वसन योजनेमुळे त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.२९ आॅगस्ट २००५पासून राज्यात नक्षल आत्मसमर्पण योजना लागू झाली. सुरुवातीला पुनर्वसन कार्यक्रम थंड बस्त्यात होता. त्यामुळे त्याकडे नक्षलवादी आकर्षित झाले नव्हते. गेल्या चार-पाच वर्षांत पुनर्वसन कार्यक्रमाला गती देण्यात आली व नक्षल आत्मसमर्पण योजनेचा चेहरामोहरा बदलला. आता आत्मसमर्पणासाठी मोठी यादीच पोलिसांकडे आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, त्या माध्यमातून अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणासाठी तयार झाले आहेत. नक्षलवाद्यांविरुद्ध पोलीस सर्वच आघाड्यांवर लढत असल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. परिणामी, दलममधून आत्मसमर्पण करणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. १० वर्षांत ४८३ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस प्रशासनासमोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहाकडे वाटचाल केली आहे. नक्षल चळवळीत भरकटलेला आदिवासी बांधव लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येत आहे. दलम सदस्य व जहाल नक्षलवादी मदनअय्या उर्फ बालना बलय्या याने आत्मसमर्पण केल्यानंतर, आतापर्यंत एक स्टेट झोनल कमिटी सदस्य, सहा डिव्हिजनल कमिटी सदस्य, १६ कमांडर, २४ उपकमांडर, २१८ दलम सदस्य, ११० क्षेत्रीय/ग्रामरक्षक दल सदस्य, १२७ संगम सदस्य यांनी नवा मार्ग निवडला. २०१३मध्ये सर्वाधिक ११ नक्षल जोडप्यांनी आत्मसमर्पण केले.