शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

महामुक्काम मोर्चा स्थगित

By admin | Published: March 31, 2016 12:52 AM

दोन दिवसांपासून नाशिक येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेले किसान सभेचे महामुक्काम आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची

नाशिक : दोन दिवसांपासून नाशिक येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेले किसान सभेचे महामुक्काम आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती डॉ. अशोक ढवळे, आ. जे. पी. गावित, किसन गुजर व डॉ. अजित नवले यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेत दिली.बुधवारी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी किसान सभेच्या नेत्यांची तासभर चर्चा झाली. त्यात महामुक्काम मोर्चात सहभागी झालेल्या राज्यभरातील एक लाख शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेण्यात येईल. त्यानंतर कर्ज माफ करण्यात येईल. वनजमिनी दाव्यांचा तीन महिन्यांत पुन्हा फेरआढावा घेण्यात येईल. शेतीमालाला ५० टक्के नफा धरून भाव देण्यासाठी व तसा आधारभूत भाव ठरविण्यासाठी पीकनिहाय प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. देवस्थान गायरान जमिनी, वरकस जमिनी कसणाऱ्यांचे जिल्हावार सर्वेक्षण करून जमिनी त्यांच्या नावे करण्यासाठी कार्यवाही करू, दुष्काळी भागात संपूर्ण वीजबिल मुक्त करण्यात येईल. तसेच बिगर दुष्काळी भागात ३० टक्के बिल माफ करण्यात येईल. दुष्काळी भागात रोहयोची कामे, वेळेवर वेतन, पाणी, चारा, रेशन, जनावरांना छावण्या आदी मागण्या पूर्ण करण्यात येतील. विधानसभा अधिवेशनानंतर या सर्व प्रश्नांवर पुन्हा एकदा किसान सभेच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्यात येईल, अशी आश्वासने फडणवीस यांनी दिली. त्यांनी महामुक्काम सत्याग्रह मागे घेण्याची विनंती केल्याने हा सत्याग्रह तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय किसान सभेने घेतल्याचे नेत्यांनी सांगितले. माजी आ. नरसय्या आडाम, उद्धव पौळ, यशवंत झाडे, उमेश देशमुख, बारक्या मागांत यांच्यासह डॉ. ढवळे, गावित, गुजर, डॉ. नवले मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)