शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

मलनिस्सारण योजनेसाठी ६८३ कोटींचा प्रस्ताव

By admin | Published: March 08, 2016 2:38 AM

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दुसऱ्या टप्प्यात भुयारी मलवाहिन्या टाकण्यासाठी पालिका प्रशासनाने ६८३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत दुसऱ्या टप्प्यात भुयारी मलवाहिन्या टाकण्यासाठी पालिका प्रशासनाने ६८३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. अटल मिशन अमृत योजनेअंतर्गत हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास लगेचच या कामाला सुरुवात होईल.पालिका हद्दीत ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भुयारी गटारे व मलवाहिन्या टाकल्या होत्या. शहरात जवळपास ५० चौरस किलोमीटरच्या मलनिस्सारण वाहिन्या होत्या. त्या १५० ते ६०० मिली मीटर व्यासाच्या होत्या. या मलवाहिन्यावर साडेचार हजार मॅनहोल होते. या जुन्या मलवाहिन्या बदलून नव्या मलवाहिन्या टाकण्यासाठी पालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला. त्यास २०१० मध्ये सरकारने मंजुरी दिली. त्यानुसार २०१० पासून मलवाहिन्या टाकणे व मलनिस्सारण सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यास सुरुवात झाली. पालिकेच्या ३० पैकी १८ सेक्टरमध्ये ४० टक्के मलवाहिन्यांचे काम झाले आहे. कल्याण पूर्व व पश्चिम आणि डोंबिवली परिसरात जवळपास ४८ किलोमीटर भुयारी गटार मलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मलनिस्सारण प्रक्रियेसाठी आठ केंद्रे तयार केली जात आहे. त्यापैकी सात केंद्रांचे काम झाले आहे. तर एकाचे काम सुरू आहे.दुुसऱ्या टप्प्यात पालिकेने केंद्र सरकारकडे प्रकल्प सादर केला होता. त्यास युपीए सरकारने तत्वत: मंजुरी दिली हेती. मात्र पालिकेने बीएसयूपी प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब केल्याचे कारण देत केंद्राच्या नियोजन समितीने दुसऱ्या टप्प्याला वित्तीय मंजुरी देण्यास नकार दिला. भुयारी मलनिस्सारण प्रकल्पासोबत २४ तास पाणीपुरवठा योजनेलाही रेड सिग्नल मिळाला. त्यामुळे या योजना बारगळल्या. दरम्यानच्या काळात केंद्रात भाजपचे सरकार आले. या सरकारने जेएनएनयूआरएम योजना गुंडाळली. त्याऐवजी अटल मिशन अमृत योजना आणली. त्याअंतर्गत भुयारी मलनिस्सारणाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळविण्यासाठी पालिकेने ६८३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. ते हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवतील.