शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

प्रलंबित तपासांमुळे आरोपी मोकाट

By admin | Published: October 15, 2016 3:21 AM

सोलापूरमधील एका युवकाच्या हत्येप्रकरणाचा तपास गेले चार वर्षे प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने राज्याच्या कायदा व सुव्यस्थेच्या स्थितीवरून राज्य सरकारला

मुंबई: सोलापूरमधील एका युवकाच्या हत्येप्रकरणाचा तपास गेले चार वर्षे प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने राज्याच्या कायदा व सुव्यस्थेच्या स्थितीवरून राज्य सरकारला शुक्रवारी फैलावर घेतले. तपास करण्यास विलंब होत असल्याने राज्यातील शिक्षेच्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी आरोपी मोकाट सुटले आहेत. ही स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आखा, असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.सोलापूरचे रहिवासी भिवा हजारे यांच्या मुलाची हत्या करून आरोपी मोकाट फिरत आहेत. मात्र पोलीस काहीच हालचाल करत नसल्याने हजारे यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणाचा तपास वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने एका वर्षापेक्षा अधिक काळ तपास न केलेल्या गंभीर गुन्ह्यांची यादी सादर करण्याचे निर्देश सोलापूर पोलिसांना दिले होते. त्यावर सोलापूरच्या वकिलांनी गंभीर गुन्ह्यांच्या ५८ प्रकरणांचा तपास न केल्याचे मान्य केले.‘एकट्या सोलापूरची ही स्थिती तर उर्वरित राज्याची कल्पनाच केलेली बरी. पोलीस तपास करत नसल्याने पीडित उच्च न्यायालयात याचिका दाखल करतात. वेळेत तपास न झाल्याने आम्हाला आरोपींची निर्दोष मुक्तता करावी लागते. त्यामुळे आरोपींना असे वाटते, की त्यांनी गुन्हा केला तरी त्यांना काहीच होणार नाही. त्यामुळे सामान्यांचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) के. पी. बक्षी यांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत बक्षी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहिले. राज्य सरकारने या स्थितीला हाताळण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)