शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

सागरी शिवस्मारकापेक्षा गड टिकवा

By admin | Published: February 22, 2016 2:14 AM

राज्यातील गडकिल्ले पुढच्या पिढीने पाहिले पाहिजेत. तेथे गिर्यारोहकांचा राबता असेल तरच ते शक्य होईल. समुद्रात पुतळा बांधण्यापेक्षा गडकिल्ले टिकविणे गरजेचे आहे़ हीच शिवाजी महाराजांची

पुणे : राज्यातील गडकिल्ले पुढच्या पिढीने पाहिले पाहिजेत. तेथे गिर्यारोहकांचा राबता असेल तरच ते शक्य होईल. समुद्रात पुतळा बांधण्यापेक्षा गडकिल्ले टिकविणे गरजेचे आहे़ हीच शिवाजी महाराजांची स्मारके आहेत, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले़‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट आॅफ माउंटेनिअरिंग’च्या वतीने ज्येष्ठ गिर्यारोहक एऩ के. महाजन आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना रविवारी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ पुतळे बांधणे ही लोकांच्या आवडीची गोष्ट आहे़ अमेरिकेतील स्टॅच्यू आॅफ लिबर्टीपेक्षा मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रामध्ये उभारण्याची काय गरज आहे, असा सवाल राज यांनी केला. डोंगर पोखरले जात आहेत़ प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे़ गडकिल्ले कायम तसेच राहतील यासाठी काय करता येईल ते पाहावे़, असे ते म्हणाले.बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘शिवाजी’ या तीन अक्षरांसाठी संपूर्ण हयात खर्च केली़ शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचवला, पण त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याचे वाटेल तसेच राजकारण केले़ शिवाजी महाराज गेले नसतील, त्यापेक्षा अधिक वेळा एऩ के. महाजन हे सिंहगडावर गेले आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले़शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करावा़ मतभेद असतील तर ते व्यक्त करावेत़ प्रखर टीका करावी़ पण गडकिल्ले आणि शिवाजी महाराजांची चेष्टा करू नये, असे पुरंदरे यांनी सांगितले़ गडकिल्ल्यांवर गेल्याने स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते़ मी तरुणांना किल्ल्यांवर घेऊन जातो़ हे तरुण माझी स्फूर्ती आहेत.गडकिल्ले चढण्यात जो आनंद आहे़ तो बाजारात विकत मिळणार नाही, असे महाजन यांनी सांगितले़ पुरंदरे आणि महाजन यांच्या कार्यामध्ये साथ देणारे त्यांचे सहकारी प्रतापराव टिपरे, शैलेश वरखडे, ज्ञानेश्वर जाधव, मकरंद कोलटकर, शरदचंद्र टिळे यांचाही सन्मान करण्यात आला़ (प्रतिनिधी)