शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

पर्यावरण संवर्धनासाठी प्राण्यांचे संरक्षण होणे गरजेचे - मुख्यमंत्री

By admin | Published: March 26, 2017 3:20 AM

पर्यावरणाची परिस्थिती व निसर्ग साखळी चांगली राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे जतन होणे गरजेचे आहे.

मुंबई : पर्यावरणाची परिस्थिती व निसर्ग साखळी चांगली राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक प्राण्याचे जतन होणे गरजेचे आहे. अ‍ॅनिमल हॉस्पिटल तथा केअर सेंटरच्या निर्मितीकामी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. राज्य शासनाच्या वन विभागाने जंगल आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. पूर्वी लोक वन्य प्राण्यांना शत्रू समजत असत, पण वन विभागाने याबाबत केलेल्या जनजागृतीमुळे आता जंगल आणि प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी लोक स्वत:हून पुढे येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.टाटा ट्रस्ट आणि पीपल फॉर अ‍ॅनिमल यांच्यामार्फत मुंबई येथे प्रस्तावित असलेल्या अ‍ॅनिमल हॉस्पिटल आणि केअर सेंटरचे भूमिपूजन शुक्रवारी हॉटेल ताज पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री मेनका गांधी म्हणाल्या, ‘निसर्गातील प्रत्येक प्राणी महत्त्वाचा आहे. निसर्गातील प्राण्याची एखादी प्रजाती नष्ट झाली, तर त्याचा पर्यावरणावर मोठा दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक प्राण्याचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)