शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

शिक्षेचा फास आवळला

By admin | Published: April 06, 2016 4:27 AM

राज्यात सर्वाधिक गुन्हे सिद्ध होणाऱ्या आयुक्तालयांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दोन वर्षात तब्बल १२७९ गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा झाली आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई राज्यात सर्वाधिक गुन्हे सिद्ध होणाऱ्या आयुक्तालयांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दोन वर्षात तब्बल १२७९ गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा झाली आहे. पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाबरोबर पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत चालले आहे. परंतु पुरेसे पुरावे हाती न लागल्यामुळे अनेक गुन्ह्यांमधील आरोपी न्यायालयातून मोकाट सुटतात. शिवाय गुन्हे सिद्ध होत नसल्याने सामान्य नागरिकही नाराजी व्यक्त करतात. यामुळे राज्यभर गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्याकडे पोलिसांकडून लक्ष देण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील सर्वाधिक दोन वर्षामध्ये प्रथम वर्ग न्यायालयात २३५२ गुन्हे निकाली लागले असून त्यापैकी ८१५ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. तर सत्र न्यायालयात २३३ गुन्ह्यांचा निकाल लागला असून ४२ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे. अटक आरोपींना शिक्षा लागलेल्या गुन्ह्यांमध्ये बालकांचा लैंगिक अत्याचार, हत्या, जबरी दरोडा, बलात्कार, अमली पदार्थ तस्करी अशा गंभीर गुन्ह्यांसह हाणामारी, अपघात तसेच चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. एखाद्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर वर्षानुवर्षे हे खटले सुरु असतात. तेवढ्या कालावधीत आरोपी विरोधातील पुराव्याचे जतन करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असते. यावेळी भेडसावणाऱ्या सर्व परिस्थितीवर मात करुन तपास अधिकाऱ्यांनी मांडलेल्या भक्कम पुराव्यामुळे त्या आरोपींना शिक्षा लागली आहे. पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, गुन्हे शाखेचे उपआयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ एकचे शहाजी उमाप, परिमंडळ दोनचे विश्वास पांढरे व इतर अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढत आहे. पोलीस एखाद्या गुन्ह्याचा तपास पटकन लावतात. परंतु तो गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध होत नाहीत. अनेक वेळा साक्षीदार त्यांची साक्ष बदलतात, काही प्रकरणांमध्ये तपासात त्रुटी राहिलेल्या असतात. यामुळे गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. आरोपींना शिक्षा व्हावी व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी पोलीस विशेष प्रयत्न करीत असल्याचे यातून उघड होत आहे.