शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

टोकन दिलेली सर्व तूर खरेदी करा

By admin | Published: July 06, 2017 4:06 AM

राज्यातील तूर खरेदी केंद्रावर टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील तूर खरेदी केंद्रावर टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मात्र, या तुरीची खरेदी करताना ती शेतकऱ्यांची आहे की व्यापाऱ्यांची याची काटेकोर तपासणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.आमदार डॉ. संजय कुटे, डॉ.अनिल बोंडे, प्रशांत बंब, आशिष देशमुख, आदींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदन दिले होते. तूर खरेदीची शेवटची मुदत १० जूनपर्यंत असतांना शेतकऱ्यांची तूर पावसाने भिजू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ३१ मेपर्यंत तुरीचे टोकन घेण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र १० जूनला तूर खरेदी थांबविल्यानंतर टोकनधारक शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले असल्याची तक्रार या आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली. ज्या शेतकऱ्यांनी ३१ मे पर्यंतच्या कालावधीत तूर खरेदीचे टोकन घेतले आहे अशा सर्वांची तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली होती. याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, ही तूर शेतकऱ्यांचीच खरेदी केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून तूर खरेदी करता कामा नये. याबाबत संबधित यंत्रणेने काटेकोर तपासणी करावी, असे आदेशही त्यांनी दिले.