शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘महाज्योती’च्या योजनांच्या नियोजनातील त्रुटींमुळे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 08:58 IST

पीएच.डी.धारकांच्या समस्या सुटेनात : विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची प्रतीक्षा

नागपूर : ओबीसी व व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आदींसाठी स्थापना करण्यात आलेल्या ‘महाज्योती’द्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या नियोजनातच त्रुटी असल्याने एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पीएच.डी.धारक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, उच्च शिक्षणासाठी आयोजित प्रवेशपूर्व कोचिंग घेणारे विद्यार्थी असोत की यूपीएससीचे विद्यार्थी; या सर्वांकडून ‘महाज्योती’च्या संचालनकर्त्यांवर ठपका ठेवण्यात येत आहे.ओबीसीचे ८० विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र झाले आहे. महाज्योतीने विद्यावेतन देण्यासाठी ५ ते २५ एप्रिलदरम्यान अर्ज मागितले होते. ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली; पण विद्यावेतनाबाबत काहीच निर्णय झाला नाही.या आहेत पीएच.डी.धारकांच्या मागण्यामहाज्योतीने संशोधन करण्यासाठी जाहिरात काढली. त्यात अर्ज स्वीकारण्याची तारीख ३० मे होती. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र गोळा करणे शक्य झाले नाही. सारथीने मुदतवाढ दिली; पण महाज्योतीने दिली नाही.महाज्योती केवळ २०१९ मध्ये नोंदणी केलेल्या पीएच.डी.धारकांनाच लाभ देणार आहे. त्यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश करावा.सारथीमध्ये संशोधनासाठी ५०० जागा आहेत; पण महाज्योतीत व्हीजेएनटी व ओबीसीचा समावेश असताना केवळ १५० जागा आहेत. किमान ७०० जागा कराव्यात. बार्टी आणि सारथीएवढेच पीएच.डी.धारकांना विद्यावेतन द्यावे.पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणही अपुरेचपोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण १० हजार युवकांना देण्यात येणार होते. चार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. केवळ १०० विद्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण देणाऱ्यांना अनुभव नाही. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा होता. त्यात टॅब्लेट देण्यात येणार होते. त्याबाबतचे काहीच नियोजन नाही.पीएच.डी. धारकांच्या समस्या कायमच‘सारथी’ची स्थापना २०१८ मध्ये झाली आणि महाज्योतीचीसुद्धा याच वर्षी नोंदणी झाली. मराठा कुणबी समाजासाठी काम करणाऱ्या सारथीने पीएच.डी.धारकांना सर्व लाभ दिले; पण महाज्योती पीएच.डी.धारकांचे प्रश्नच सोडवू शकली नाही.- किरण वर्णेकर, पीएच.डी.धारकविमुक्त भटक्यांचा केवळ नावापुरता समावेशमहाज्योतीमध्ये विमुक्त भटक्या जातिजमातीचा समावेश आहे. भटक्यांची शैक्षणिक पातळी अत्यल्प आहे. त्यामुळे योजनांचा लाभ केवळ ओबीसीचे विद्यार्थी घेऊ शकतात. मच्छीमार, बेलदार, पारधी, कैकाडी, नाथजोगी, गोसावी, मशानजोगी या जमातींवर संशोधनाचे कार्य होणे गरजेचे आहे.- गजानन चंदावार, संघटक, युवा संघर्ष वाहिनी