शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

उल्हासनगर महासभेत राडा

By admin | Published: January 09, 2015 10:57 PM

महापालिका महासभेत अशासकीय प्रस्तावाद्वारे अधिकाऱ्याला उपायुक्तपदी बढती देण्यावरून महासभेत प्रचंड राडा झाला

प्रकाश वराडकर- रत्नागिरी -मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागणाऱ्या वाढीव जमिनीच्या मोजणीचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी दोन्ही जिल्ह्यात १५७२ हेक्टर्स जमिनीची आवश्यकता असून, सध्याच्या महामार्गाची ७९९.४९ हेक्टर्स जागा शासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे चौपदरीकरणासाठी आणखी ७७३ हेक्टर्स जमिनीचे संपादन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी विभागाच्या सुत्रांनी दिली. महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेच्या मोजणीचे काम १२ डिसेंबर २०१४पासून राष्ट्रीय महामार्ग विभाग व भूमी अभिलेखतर्फे सुरू करण्यात आले आहे. मुंबई - गोवा महामार्गातील २०६.३२ किलोमीटर्सचा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. या चौपदरीकरणासाठी इंदापूर ते खवटी -ओझरखोल, ओझरखोल ते राजापूर, राजापूर ते झाराप असे टप्पे ठरविण्यात आले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील मुुंबई - गोवा महामार्गावर मोठे २९, तर छोटे ५८ पूल उभारण्यात येणार आहेत. कशेडी ते ओझरखोल या पहिल्या टप्प्यात १५ मोठे पूल असून, त्यातील १३ नवीन दुपरी होणार आहेत, तर दोन नवीन पूल चारपदरी होणार आहेत. ओझरखोल ते राजापूर या दुसऱ्या टप्प्यात चार मोठे पूल असून, त्यातील एक नवीन चारपदरी, तर तीन नवीन दुपदरी पुलांचा समावेश आहे. राजापूर ते झाराप या तिसऱ्या टप्प्यात १० मोठे पूल असून, हे सर्व चारपदरी होणार आहेत. हे सर्व मोठे पूल ३० मीटर्सपेक्षा अधिक लांबीचे आहेत.३० मीटरपेक्षा कमी लांबीचे ५८ पूल दोन्ही जिल्ह्यात होणार असून, कशेडी ते ओझरखोल या पहिल्या टप्प्यात असे १५ छोटे पूल असून, त्यातील १३ नवीन दुपदरी आणि २ नवीन चार पदरी पुलांचा समावेश आहे.ओझरखोल ते राजापूर या दुसऱ्या टप्प्यात १७ छोटे पूल असून, १२ नवीन चारपदरी, तर पाच नवीन दोन पदरी पुलांचा समावेश आहे. राजापूर ते झाराप या तिसऱ्या टप्प्यात २६ छोटे पूल असून, १२ नवीन चार पदरी, १४ नवीन दोन पदरी पुलांचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. (प्रतिनिधी)मोजणीचे काम सुरू...गेल्या १५ दिवसांपासून महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या वाढीव जागेच्या मोजणीचे काम सुरु झाले आहे. मात्र, कोकणातील अनुभवानुसार मोजणी करणाऱ्यांना विरोधाची झळ गेल्या १५ दिवसातच सोसावी लागली आहे. केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून महामार्ग चौपदरीकरणाचा आराखडा आल्याने अनेक वळणे सरळ करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन संपादनात काही ठिकाणी एकाच बाजूची जागा जाणार आहे. त्याबाबत संबंधित जमीन मालकांकडून काही आक्षेप आल्याने पाली, मराठेवाडी, खानू व अन्य काही भागातील मोजणीचे काम पंचयादी घालून तहकूब ठेवण्यात आले आहे. जमीन मालकांच्या सूचना केंद्र सरकारकडे पाठविल्या जाणार आहेत.