शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी - कपिल पाटील

By नितीन पंडित | Published: March 26, 2023 4:19 PM

या देशात तब्बल ५२टक्के समाज ओबीसी समाज आहे, त्यांच्या वक्तव्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचा काम राहुल गांधी यांनी केला आहे

भिवंडी - देशाला जागतिक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत असतानाच राहुल गांधी यांनी समस्त ओबीसी समाजाची बदनामी करण्याचे काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशातील ओबीसी समाजाची माफी मागितलीच पाहिजे अशी भूमिका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी आपल्या दिवे अंजुर येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

कपिल पाटील म्हणाले की, या देशात तब्बल ५२टक्के समाज ओबीसी समाज आहे, त्यांच्या वक्तव्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचा काम राहुल गांधी यांनी केला आहे आणि म्हणूनच देशातील ओबीसी समाजामध्ये गांधी यांच्याविरोधात प्रचंड प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्ष सोबतच समस्त ओबीसी समाज आंदोलनाच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या निषेध नोंदवीत आहे.एवढे करूनही राहुल गांधी यांनी माफी मागणार नाही अशी जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत मग्रुरी पणाची आहे अशी देखील मंत्री पाटील यांनी यावेळी केली.

तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांमध्ये नाही तर जगामध्ये ही स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यामुळे मोदींना बदनाम करण्याचा डाव सगळ्या विरोधी पक्षाने सुरू केलेला आहे, पण या देशातील जनता सुज्ञ असून देशाच्या जनतेला माहित आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये या देशांमध्ये नऊ वर्षांमध्ये एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आणि सामान्य नागरिकांनाही हा मुद्दा मान्य होत नाही की मोदीजींच्या कार्यकाळात भ्रष्टाचार होईल अशा प्रकारची शंका कोणाच्याही मनामध्ये तसुभरही शंका येत नाही. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वावर देशाचा पूर्ण विश्वास आहे असंही कपिल पाटील यांनी सांगितले.  

दरम्यान, मोदी अदानी यांच्या संबंधाबाबत विचारले असता मोदींचा आणि अदानींचा काही संबंध या गोष्टी येत नाही. त्याच्यामुळे ही नागरिकांची दिशाभूल करण्याचा यांचा प्रयत्न आहे त्याच्यापासून जनता निश्चितपणाने सावध आहे. जनतेला माहित आहे की देशाला पुढे कोण नेऊ शकतो, मागच्या नऊ वर्षात जे विकासाचं काम झालेलं आहे ते आपल्या नजरेसमोर आहे. देश प्रगतीपथावर आहे. आता जगामध्ये मंदी असताना भारत देश मंदीपासून सावरलेला आहे याचे एकमेव कारण काय असेल या देशाला लाभलेले मोदींचे नेतृत्व अशा शब्दात मंत्री पाटील यांनी मोदींचे कौतुक करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध या पत्रकार परिषदेत केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी