शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे विघ्न दूर; गणेशोत्सवात रायगड पोलिस व प्रशासनाचे यश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 6:33 AM

मुळात मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली १४ वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास त्रासदायक ठरत होता.

अलिबाग : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास विनाअपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाने दक्षता घेतली होती. त्यामुळे गेल्या सात दिवसांत या मार्गावर एकही अपघात झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांनाही काही प्रमाणात यश मिळाल्याचा दावा आता केला जात आहे.

मुळात मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली १४ वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास त्रासदायक ठरत होता. पेण-वडखळ हा सात किलोमीटरचा प्रवास अपघात आणि वाहतूककोंडीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत होता. परंतु यंदा गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणि आता परतीचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र तैनात आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड जिल्हा वाहतूक पोलिस शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलिस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम केले. गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासातही उत्तम नियोजन केल्यामुळे अपघातांचे प्रसंग घडले नाहीत. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सवात अपघातांचे विघ्न दूर झाल्याचे मत कोकणवासियांमध्ये व्यक्त होत आहे.

१५० स्वयंसेवक आले धावून

गणेशोत्सवापूर्वी आणि या उत्सवकाळात पावसाने उघडीप दिल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्तेदुरुस्ती करता आली. त्यामुळे प्रवाशांना त्रास झाला नाही. मात्र ऊन आणि रस्त्यांवरील धुळीची तमा न बाळगता, पोलिस यंत्रणा, पोलिसमित्र आपले कर्तव्य चोख बजावताना दिसत होते. यामुळेच गणेशोत्सवातील प्रवास सर्व कोकणवासीयांना सुखकर वाटला. या वर्षी गणेशभक्तांची वाट सुखकर करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीला १५० स्वयंसेवक धावून आले होते. गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी असो वा इतर उद्भविणारे प्रश्न असो; त्यांचे निराकरण करण्यासाठी हे स्वयंसेवक महामार्गावर काम करीत होते.

टॅग्स :MumbaiमुंबईgoaगोवाAccidentअपघात