शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

पाण्यासाठी मिरजेतून लातूरला धावणार रेल्वे

By admin | Published: April 05, 2016 10:42 PM

हिरवा कंदील : एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्याकडून यंत्रणेची पाहणी

मिरज : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी आता मिरजेतून रेल्वे धावणार आहे. मंगळवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मिरजेत जिल्हा प्रशासन व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या. महिला वबालकल्याणमंत्री व लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत मिरज रेल्वेस्थानकात पाणी वाहतूक व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली.मिरज विश्रामगृहात झालेल्या बैठकीत महसूलमंत्री खडसे यांनी मिरजेतून तातडीने लातूरला पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. के. गरंडे यांना दिल्या. पंढरपुरातून लातूरला टँकरने पाणी नेण्यास रेल्वेने मान्यता दिली आहे. आता मिरजेतून पाणी नेण्यात येणार असल्याने रेल्वेच्या परवानगीचे आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यात येतील. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. मिरजेतील रेल्वेची पाणी योजना जलशुध्दीकरण केंद्राची त्यांनी माहिती घेतली. रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्राची उभारणी करणाऱ्या शशांक जाधव यांनी दररोज ४५ लाख लिटर क्षमतेच्या मिरजेतील रेल्वे पाणीपुरवठा योजनेतून दररोज ५० लाख लिटर पाणी उपसा व शुध्दीकरण करता येईल, असे सांगितले. मिरज रेल्वेस्थानक व कर्मचारी वसाहतीला दररोज १५ लाख लिटर पाणी लागते. उर्वरित पाणी टँकरव्दारे लातूरला पाठविता येणे शक्य असल्याचे सांगितले. प्रत्येकी २४ हजार लिटर क्षमतेचे ५० टँकर भरण्यासाठी आठ तास वेळ लागणार असल्याने एकाचवेळी २४ टँकर भरतील, अशा पाईपलाईनची व उच्च क्षमतेच्या पंपाची व्यवस्था करण्याच्या सूचना खडसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार रेल्वे यार्डात सुमारे एक किलोमीटर लांबीची पाईपलाईनची व्यवस्था करून टँकर भरण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने आठ दिवसांत पाणी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याने त्यांनी सांगितले. वारणा धरणात पुरेसा पाणी साठा असून, पुढील सहा महिने पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याने लातूरला पाणी देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजीवकुमार, आमदार संभाजीराव पाटील, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता टी. पी. सूर्यवंशी, रेल्वेच्या बांधकाम विभागाचे अभियंता एस. नागराळे, स्थानक अधीक्षक व्ही. रमेश यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) \दररोज पाणी जाणार : एकनाथ खडसेमिरजेतील रेल्वेच्या जलशुद्धिकरण केंद्रातून दररोज ५० टँकरद्वारे सुमारे २५ लाख लिटर पाणी लातूरला नेण्यात येईल. लातूर येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लातूरच्या पाणीटंचाईबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल; मात्र सद्य:स्थितीत मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री खडसे यांनी मंगळवारी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली.वारणा धरणात सहा महिने पुरेल एवढा ११ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. मिरजेत रेल्वेच्या पाणी योजनेतून टँकर भरण्याची व्यवस्था आहे. यातून दर तीन दिवसांनी लातूर शहराला पाणीपुरवठा होईल. मिरजेतून लातूरला रेल्वे पोहोचण्यासाठी दहा तास लागणार आहेत. मिरजेतून टँकरने पाणी नेण्यासाठी आवश्यक प्राथमिक बाबींची पूर्तता करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आठ दिवसांत रेल्वे टँकर उपलब्ध झाल्यानंतर लातूरला पाणीपुरवठा सुरु होईल.