शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

रेल्वे मार्गाचे काम एप्रिलपासून

By admin | Published: January 21, 2016 3:57 AM

जयगड बंदर कोकण रेल्वे मार्गाशी जोडण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या जयगड ते डिंगणी मार्गासाठी जमीन भूसंपादनाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : जयगड बंदर कोकण रेल्वे मार्गाशी जोडण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या जयगड ते डिंगणी मार्गासाठी जमीन भूसंपादनाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार असून एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची ७० वी बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील बंदरांचा विकासासाठी शासन आग्रही आहे. कोकण रेल्वे कार्पोरेशन, जयगड बंदर आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत जयगड ते डिंगणी हा ३५ कि.मी.चा नवीन रेल्वेमार्ग निर्माण करण्यात येत आहे. ७७५ कोटींच्या या प्रकल्पाच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण कोकण रेल्वे कार्पोरेशनने पूर्ण केले आहे.या बैठकीत व्यापक ‘बंदर विकास धोरण-२०१५’ च्या सद्य:स्थितीवर त्याचबरोबर रेवस-आवरे, विजयदुर्ग व रेडी या बंदर विकास प्रकल्पांना मुदतवाढ देण्याबाबत चर्चा झाली. तसेच ‘महाराष्ट्र जलक्रीडा प्रकल्प धोरण-२०१५’ तयार करण्यात आले असून त्यास बोर्डाची मान्यता देण्यात आली. तर डहाणू तालुक्यातील वाढवण येथे सॅटेलाईट पोर्टच्या निर्मितीकरिता जेएनपीटी व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारास मंजुरी देणे, दिघी-रोहा रेल्वे जोडणी प्रकल्पात बोर्डाने घ्यावयाचे समभाग, पनवेल खाडीमध्ये मौजे उलवा येथे शिपयार्ड प्रकल्प निर्माण करणे, वांद्रे-वरळी सागरी सेतुनजीक माहीम खाडीमधील बोर्डाच्या मालकीच्या जेट्टीवरुन तरंगते हॉटेल प्रकल्प चालविणे, ठाणे खाडी किनारी वाशी पुलाजवळ मौजे तुर्भे येथे बहुउद्देशीय जेट्टी निर्माण करणे, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे बोर्डाच्या स्वमालकीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे, रेवस येथे अंतर्गत जल वाहतूक प्रकल्पांतर्गत रो-रो जेट्टी तसेच सुविधा विकसित करणे आदी विषयांचे सादरीकरण करण्यात आले.