शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

बांधकाम परवान्यांसाठी लातुरात अर्जांचा पाऊस

By admin | Published: October 22, 2016 11:19 PM

दुष्काळामुळे तब्बल तीन वर्षांपासून घरबांधणीचे स्वप्न अपुरे राहिलेल्या लातूरकरांनी यंदा पावसाने कृपादृष्टी केल्याने बांधकाम परवान्यांसाठी अर्जांचा पाऊस पाडला आहे.

लातूर : दुष्काळामुळे तब्बल तीन वर्षांपासून घरबांधणीचे स्वप्न अपुरे राहिलेल्या लातूरकरांनी यंदा पावसाने कृपादृष्टी केल्याने बांधकाम परवान्यांसाठी अर्जांचा पाऊस पाडला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात बांधकामाच्या परवान्यांना स्थगिती होती़ यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे महापालिकेने बांधकाम परवान्यांना मंजुरी देण्यास सुरुवात केली. १ सप्टेंबर ते २२ आॅक्टोबर या दीड महिन्याच्या कालावधीत बांधकामासाठी ५०७ अर्ज आले असून, त्यापैकी ४३० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे़दुष्काळामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प कोरडेठाक पडले होते़ नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम परवान्यांना बंदी केली होती़ परिणामी, तीन वर्षांपासून बांधकामे रखडली होती़ यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा १२ मिमी़ अधिक पाऊस झाला. त्यामुळे सर्व मोठे, मध्यम व लघु प्रकल्प तुडूंब भरले. शहरातील पुनर्भरण केलेले बोअरही भरले आहेत. पाच नंबर चौक ते शासकीय दवाखान्यापर्यंतच्या समांतर रस्त्यावर बांधकामे सुरू झाली आहेत़ सुशिलादेवी नगर, रिंग रोड, आदर्श कॉलनी, विवेकानंद चौक, रेणापूर नाका भागातील बांधकामांना गती आली आहे़ (प्रतिनिधी)परवान्याचेही नियम शिथिलपाणीटंचाईमुळे तीन वर्षांपासून बांधकामांसाठी किचकट नियम होते़ पावसामुळे आता सरसकट परवाने देण्याचे प्रक्रिया सुरू केली आहे़ मालकी हक्काचा उतारा, अर्ज व जागेचा नकाशा या तीनच कागदपत्रासह लागणाऱ्या कामगार उपकराला प्राधान्य देण्यात आले आहे. - सुनील देशपांडे, नगर रचनाकार, महापालिका