शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

एसटीकडे प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस

By admin | Published: December 23, 2016 5:15 AM

बस स्थानकांवरील सोयी, अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा, अयोग्य तिकीट इत्यादी तक्रारी गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांकडून एसटी

मुंबई : बस स्थानकांवरील सोयी, अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा, अयोग्य तिकीट इत्यादी तक्रारी गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांकडून एसटी महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी सर्वाधिक येत असल्याचे समोर आले. गेल्या दोन वर्षांत दोन हजारपेक्षा जास्त तक्रारी या गैरवर्तनाच्या आहेत. त्यामुळे चांगली वर्तवणूक ठेवून प्रवासी वाढवा अशा सूचना वारंवार करूनही त्याकडे कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्षच होत आहे. एकंदरीतच प्रवाशांच्या तक्रारी पाहता त्या त्वरित सोडवता याव्यात यासाठी ‘२४ तास कॉल सेंटर’ उभारण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत विविध कारणांनी मोठी घट झाली. पाच वर्षांत १५ कोटी प्रवासी कमी झाले असून हा सर्वात जास्त फटका आहे. त्यामुळे महामंडळाने नवीन वर्षातील जानेवारी महिन्यापासून तीन महिन्यांसाठी प्रवासी वाढवा विशेष अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात प्रवासी वाढवण्यास मदत करणारे आगार, चालक, वाहकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. प्रवासी कमी होण्याची विविध कारणे असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत असून यामध्ये प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारी हेदेखील प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी गैरवर्तवणूक केल्याच्या २0१४-१५ मध्ये १ हजार २७ तक्रारी प्राप्त झाल्या. तर २0१५-१६ मध्ये हाच आकडा १ हजार १२ एवढा आहे. त्यानंतर सर्वाधिक तक्रारी बसमध्ये जागा न मिळण्याबाबतच्या आहेत. गेल्या वर्षी ३९९ तर या वर्षी ३८६ तक्रारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच एसटी बसचा नसलेला वक्तशीरपणा, अयोग्य तिकीट, प्रवास भाडे याबाबतच्याही तक्रारी एसटीकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत.