शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

गावागावांत होणार पावसाची नोंद

By admin | Published: April 16, 2016 2:30 AM

देशातील तब्बल सहा लाख गावांमध्ये पडणाऱ्या पावसाची नोंद करण्याची योजना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) हाती घेतली आहे. पर्जन्यमानाचे चक्र बदलत असल्याने

- राजानंद मोरे, पुणे

देशातील तब्बल सहा लाख गावांमध्ये पडणाऱ्या पावसाची नोंद करण्याची योजना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) हाती घेतली आहे. पर्जन्यमानाचे चक्र बदलत असल्याने देशाला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना पावसाची स्थिती तसेच कृषीविषयक सल्ला देण्याचे नियोजन आहे.सध्या देशात शहर, तालुक्याची ठिकाणे, धरण पाणलोट क्षेत्र किंवा काही महत्त्वाच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्याआधारे संपूर्ण शहर, तालुक्याची पावसाची सरासरी काढली जाते. आता ‘एक गाव एक पर्जन्यमापक यंत्र’ हे सूत्र निश्चित करण्यात आले असून देशातील तब्बल सहा लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेविषयी कृषी मौसम विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. एन. चटोपाध्याय म्हणाले की, देशाच्या भौगोलिक स्थितीचा विचार केल्यास पावसाच्या प्रमाणात खूप वैविध्य आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या परिसरात पडलेल्या पावसाचे अचूक प्रमाण सांगणे तसे शक्य होत नाही. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविल्यास कमी अंतरावरील पावसाचे अचूक प्रमाण समजण्यास मदत होणार आहे. त्यानुसार तेथील पावसाच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना कृषीविषयक विविध मार्गदर्शन करणे शक्य होईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित गाव किंवा परिसरात एखादी योजना राबविण्याबाबतही मदत होईल. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यमापक बसविण्याचा मान यामुळे भारताला मिळणार आहे.कर्नाटकमधून लवकरच या योजनेची सुरुवात होईल. येत्या पावसाळ्यात तेथील किमान शंभर गावांत यंत्रे बसविली जातील. तसेच सहा महिन्यांत किमान दोन राज्यांमध्ये ही यंत्रे बसविली जातील. गावा-गावांमधून पावसाची माहिती एसएमएसद्वारे एनआयसीकडे संकलित केली जाणार आहे. त्यासाठी संबंधितांना प्रशिक्षणही दिले जाईल. - डॉ. एन. चटोपाध्याय, उपमहासंचालक, कृषी मौसम विज्ञान विभाग