शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कोर्टाच्या इमारतीत करा पर्जन्य जलसंधारण

By admin | Published: March 19, 2016 2:21 AM

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळग्रस्त भागांत असलेल्या न्यायालयांत पिण्यासाठीही पाणी मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीची गांभीर्याने

मुंबई : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळग्रस्त भागांत असलेल्या न्यायालयांत पिण्यासाठीही पाणी मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल उच्च न्यायालयाने राज्यातील प्रत्येक न्यायालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बोअरवेल उपलब्ध करण्यासाठी धोरण आखण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.मुंबईसह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांतील कनिष्ठ न्यायालयांत पक्षकार व वकिलांकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. याची दखल घेत उच्च न्यायालयाने ‘स्यु-मो’ दाखल करून घेतली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होती. या सुनावणीवेळी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांनी न्यायालयांत वीज आणि पाणीपुरवठ्याबाबत सरकारकडे विचारणा केली. त्यावर सरकारी वकिलांनी भागात नऊ ते दहा तास भारनियमन होत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणले.‘वीज नाही, तर वॉटर कूलरही काम करू शकत नाहीत. मुळात पाणीच नाही,’ असे खंडपीठाने म्हटले. ‘न्यायालयांच्या नव्या इमारतींंमध्ये रेन हार्वेस्टिंग तर जुन्या इमारतींमध्ये बोअरवेल बसविण्यासाठी आवश्यक ते धोरण आखा,’ असे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले. त्यावर तशी तरतूद असल्याचे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले. ‘अलीकडेच बांधण्यात आलेल्या न्यायालयीन इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. शक्य झाल्यास जुन्या इमारतींमध्येही रेन हार्वेस्ंिटग सुरू करू. शक्य न झाल्यास बोअरवेल बसविण्याचा विचार सरकार करीत आहे,’ असे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)

भारनियमन असलेल्या भागातील न्यायालयांना किमान सकाळी ११ ते संध्या. ५ वाजेपर्यंत वीज पुरविण्याचे निर्देश एमईसीबीला देऊ किंवा जनरेटर्स पुरवू, असे आश्वासन सरकारने उच्च न्यायालयाला दिले. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी ७ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.