शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

रायगडसाठी देणार दीडपट निधी

By admin | Published: January 22, 2016 3:32 AM

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पुनर्विकासासाठी तसेच या गडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पुनर्विकासासाठी तसेच या गडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित रायगड महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘जागतिक नकाशावर रायगड झळकावा हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. महोत्सवातून पर्यटनाला चालना मिळेल,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘छत्रपतींचा इतिहास केवळ त्यांच्या शौर्यापुरताच मर्यादित नव्हता. रयतेचा पालक कसा असू शकतो हे त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिले होते. राज्यात सत्तेवर आल्यानंतर आम्ही, महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आराखडा तयार केला आहे. त्यात रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी १२ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र रायगड किल्ल्याच्या पुनर्बांधणी व पुनर्विकासासाठी अर्थमंत्री घोषित करतील त्याच्या दीडपट निधी मंजूर केला जाईल,’ अशी घोषणाही फडणवीस यांनी या वेळी केली. ‘राज्यासह केंद्रातही आम्ही सत्तेवर आहोत त्यामुळे पुरातत्त्व विभागाला राज्य शासनाकडून दिलेला रायगड विकासाबाबतचा प्रस्ताव जसाच्या तसा मंजूर होईल,’ असेही फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले. शिवसृष्टी साकारणाऱ्या कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे त्यांनी याप्रसंगी कौतुक केले. (विशेष प्रतिनिधी)केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी ‘या महोत्सवामुळे रायगडचा इतिहास जिवंत होऊन त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल,’ असा विश्वास व्यक्त केला. ‘गडावर पूर्वी शिवरायांना दिली जाणारी शासकीय मानवंदना काही वर्षांपासून खंडित झाली आहे. ती मानवंदना पुन्हा सुरू करावी,’ अशी मागणीही गीते यांनी या वेळी केली.कार्यक्रमाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, माजी मंत्री आमदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार जयंत पाटील, आमदार विनायक मेटे, पोलीस उपमहासंचालक प्रकाश बोरुडे, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, सांस्कृतिक संचालक अजय आंबेकर उपस्थित होते. अलिबाग : राणीवसा, पालखी दरवाजा, होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, नगारखाना, राजसदरेवरील मेघडंबरी या स्थळांना भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिवकालीन इतिहासाचा अनुभव घेतला. त्यांनी समाधी व राजसदर येथील सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला आदरांजली वाहिली. राजसदर येथे मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे भव्य व अत्यंत देखणे नाट्य सादर करण्यात आले. जवळपास दीड तास मुख्यमंत्र्यांनी शिवकालीन इतिहास अनुभवला. छत्रपतींच्या काळातील पारंपरिक टाळनृत्य, दांडपट्टा, कसरतीचे मर्दानी खेळ, ढोल-ताशे यांनी उपस्थितांना शिवकाळाची झलक दाखविली. शिवरायांच्या काळात रायगड कसा होता याचे साक्षात रूप साकारण्यात आले आहे. याचा आनंद व समाधान वाटत असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘महाराजांचे नियोजन, दूरदृष्टी, स्थापत्यशास्त्र तसेच गतकालीन संस्कृती आदी बाबींची जाणीव व माहिती नव्या पिढीला या महोत्सवामुळे होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.