शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
5
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
6
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
7
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
8
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
9
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
10
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
11
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
13
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
14
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
15
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
16
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
17
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
19
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
20
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का

राज ठाकरेंनी मुद्दा मांडला अन्...; शिंदे-फडणवीस सरकारचं अभिनंदन; माहीम मजार वादावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:16 PM

"...तर आम्ही शेजारीच सर्वात मोठे गणपती मंदिर बांधू असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला होता. यानंतर आता प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करत सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवले. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे."

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात माहिमच्या समुद्रातील एका अनधिकृत बांधकामासंदर्भात थेट व्हिडिओच दाखवला होता. एवढेच नाह, तर गेल्या २ वर्षात तेथे कथित मजार बांधण्यात आली, अनधिकृत बांधकाम करण्यात आले. मात्र याकडे  प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. याच बरोबर या ठिकाणावर कारवाई झाली नाही. तर आम्ही शेजारीच सर्वात मोठे गणपती मंदिर बांधू असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला होता. यानंतर आता प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करत सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवले. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 

बावनकुळे म्हणाले, अनेक गोष्टी अशा असतात ज्या सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. मात्र मला अभिमान आहे की, राज ठाकरे यांनी काल यासंदर्भात (माहीम येथील मजार) माहिती देताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तातडीने यावर कारवाई सुरू केली. यासाठी मी दोघांचेही अभिनंदन करतो. याच बरोबर, हे सरकारच्या निदर्शनास आणून दिलं यासाठी मी राज ठाकरे यांचेही अभिनंदन करतो, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

याच बरबोर, ज्या पद्धतीने प्रतापगडावरची कारवाई झाली. आज माहीमची कारवाई झाली किंवा होणार आहे. याच पद्धतीने जिथे जिथे कुठलेही अतिक्रमण असतील ती सरकारने काढायला हवीत. तसेच, समाजात कुठल्याही प्रकारचे वैर निर्माण होणार नाही, यासाठीही सरकार काळजी घेईल. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो दोघेही नेते संवेदनशील आहेत. असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांचे भाषण दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे होते, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे असे काही बोलले असे मला वाटत नाही. उलट त्यांनी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन मांडलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुकच केले. तसेच देशात राहून जे देशा विरुद्ध बोलणे, देशात राहून पाकिस्तानचे ध्वज फडकावणे, अशा लोकांना त्यांचा विरोध आहे. त्यांचा विरोध सर्वच मुस्लिमांना नाही. जे एक टक्का लोक या देशाचे वातावरण खराब करतात त्यांविरुद्ध राज ठाकरे यांनी भूमिका आहे. त्यांनी कुठलीही धार्मिक तेढ निर्माण केलेली नाही. तसेच, देशासाठी कुठेही भांडायला तयार आहेत, आपला देश मांडायला तयार आहे. जो भारत देश आणि संविधान मानतो, ज्याला देशाचा अभिमान वाटतो. असे लोक आपल्याला हवे आहेत अशीच भूमिका त्यांची आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेEnchroachmentअतिक्रमण