शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
2
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
4
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
5
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
6
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
7
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
8
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
9
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
10
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
11
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
12
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
13
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
14
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
15
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
16
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
17
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
18
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

Raj Thackeray: राज ठाकरेंचं देशभरातील हिंदुंना आवाहन; ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 8:36 PM

ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली.

ठाणे – गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. ३ मे रोजी रमजान ईद आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने सर्व मौलवींना बोलावून भोंगे हटवण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा ३ मेनंतर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वाची भूमिका मी आज आणली नाही. पाकिस्तानी कलाकारांना हाकलवून देणारा पक्ष कोणता होता? मुंब्र्यातून अतिरेकी सापडले, वस्तरा कसा सापडेल, दाढीच करत नाही. आझाद मैदानावर रझा अकादमीनं काय धुडघूस घातला. पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, महिला पोलिसांचा शारिरीक छळ केला. त्यावर कुणीही काहीही बोलले नाही. त्यावर मनसेना मोर्चा काढला. या मोर्च्यामुळेच पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांना पदावरून काढण्यात आले. आम्ही भोंग्याची भूमिका कायम मांडली. कुठली दंगल तेढ निर्माण करायचा नाही. पण १२ ते ३ मे महाराष्ट्रातील भोंगे खाली ठरवल्यास आमच्या कडून कोणताही त्रास होणार नाही असं त्यांनी सांगितले.

दम असेल तर राज ठाकरेंना जेलमध्ये टाकून बघा; राजू पाटील यांचं अबू आझमींना 'ओपन चॅलेंज'

तसेच माझ्याबद्दल बोलले ईडीची नोटीस आली मी बदललो, आजही मला ईडीची नोटीस आली तरी जाईल पण ईडीनं नुसती संपत्ती जप्त केली तर पत्रकार परिषदेतून जाहीर शिव्या द्यायला लागले.तुम्ही शिवसेनेचे आहात की राष्ट्रवादीचे? अशा प्रवृत्तीच्या लोकांना आजोबा प्रबोधनकारांनी चांगलं वाक्य म्हटलं होतं, हे सगळे लवंडे आहेत अशा शब्दात राज ठाकरेंनी शिवसेना नेते संजय राऊतांचा समाचार घेतला.

घरचं लग्नकार्य सोडून वसंत मोरे ठाण्याला; राज ठाकरेंच्या सभेला हजर

मी भूमिका बदलत नाही

मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला बोलतात, मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही. एका वर्षाच्या आत मी कोहिनूरमधून बाहेर पडलो. त्या कंपनीचा तपास सुरू झाला तेव्हा मला नोटीस आली आणि ईडीच्या कार्यालयात गेलो. ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही. ज्या गोष्टी मला नाही पटल्या ते जाहीरपणे बोललो. कलम ३७० रद्द केले त्यावर अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व्हावेत हे सांगणारा मी पहिला होतो. या देशात समान नागरी कायदा आणा, या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा अशा २ मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण कराव्यात असं राज ठाकरेंनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेHinduहिंदू