शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Raj Thackeray Speech MNS Meeting : मनसेचे पदाधिकारी सुस्त पडलेत, मी ते पत्र त्यासाठीच दिलेले...; राज ठाकरेंनी बैठकीत सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:49 IST

Raj Thackeray in Mumbai: राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते. 

गेल्या काही वर्षांत माझ्या जवळच्या लोकांनी जी काही वाट लावलीय, त्यामुळे हिप रिप्लेसमेंटची सर्जरी केली. गेल्या वर्षी हाड पंक्चर करून इंजेक्शन दिले होते. परंतू वर्षभराने पुन्हा दुखणे बळावले. डॉक्टर म्हणाले की पहिल्या चार-पाच महिन्यात त्रास दिसतो, वर्षभराने नाही. मी उद्या पुण्याला जाऊन येणार आहे. एका दिवसासाठी. बैठका वगैरे लावू नका. मला त्रास होत नाहीय, पण एकदा तपासून पहायचे आहे. नाशिकलाही देवीच्या दर्शनाला जायचे आहे, असे राज ठाकरेंनीमनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन केले. 

राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते. खोटा प्रचार केला जातोय. तुम्ही सक्षम आहात, तुम्हाला कान आहेत, मेंदू आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण जी काही उत्तरे द्यावी लागतात ती थांबवा. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे, मनसे आंदोलने अर्धवट सोडतात. एक आंदोलन दाखवा. टोल आंदोलन आम्ही ६०-६५ टोलनाके बंद पाडले. शिवसेना-भाजपाच्या अजेंड्यात होते, त्यांना हे विचारायला जात नाहीत, सगळ्या जिल्ह्यांत टोल नाके सुरु आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. 

टोल नाक्यांद्वारे पैसे गोळा करतात, त्यातून निवडणुकीत केलेला खर्च काढला जातो. हे टोलनाके किती दिवस सुरु राहणार आहेत हा आपला पहिला प्रश्न होता. त्यात रोखीने पैसे येतात ते कुठे जातात याचे उत्तर आम्हाला अद्याप सरकारने दिलेले नाही. आमच्या हातात सत्ता द्या, मी बंद करून दाखवतो, असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले. टोलनाकेवाले या लोकांना पैसा पुरवितात, असा आरोपही राज ठाकरेंनी केला. भोंग्यांचे आंदोलन जे केले त्यावर पोलिसांनी म्हटलेय ९३ टक्के भोंगे बंद झालेत. जे सुरु आहेत ते कमी आवाजात अधिकृत सुरु आहेत. मी ते पत्र तुमच्या हातात दिले, मी ते सोशल मीडियावर टाकू शकलो असतो. पण तुमचा आणि लोकांचा कनेक्ट किती आहे ते मला पहायचे होते. अनेक मनसैनिकांनी मला सांगितले की आम्हाला ते पत्र मिळाले नाही नाहीतर आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवले होते. थंड पडलेत. निवडणुकीचे वारे सुरु आहेत, त्यांच्या मनात. हे जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगले नाहीय. मतदारांना कळत नसेल की कोणाला मतदान केले. हे राजकारण नाही, तर तात्पुरती आर्थिक अॅडजस्टमेंट आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.  

मनोहर जोशी होते...मी बाळासाहेबांना बाहेर पडतोय म्हणून सांगायला गेलो, तेव्हा तिथे मनोहर जोशी होते. ते खोलीच्या बाहेर गेले. बाळासाहेबांनी हात पसरले, मला मीठी मारली आणि मला म्हणाले जा. त्यांना समजले होते. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आम्ही जेवढी आंदोलने केलीत, तेवढी कुणीच केली नाहीत आणि यशस्वीही केली नाहीत. माझे भाषण सुरु असताना ठाण्यात खळ्ळकण आवाज आला. त्यानंतर मोबाईल कंपन्यांची पत्रे आली. एका आठवड्याची वेळ दिली, त्यानंतर महाराष्ट्रात मराठीत आवाज ऐकू येऊ लागला, असेही राज ठाकरे म्हणाले.  

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे