शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
2
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
3
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
4
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
5
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
6
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
7
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
8
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
9
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
10
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
11
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
12
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
13
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
14
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
15
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
16
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
17
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
18
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
19
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

उत्तर सभेत राज ठाकरे यांच्या पंतप्रधान मोदींकडे दोन मागण्या, एक समान नागरी कायदा अन् दुसरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 8:43 PM

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना राज म्हणाले, आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच-पाच आम्हाला काही असुया नाही. पण...

ठाणे - मनसेच्या पाडवा मेळाव्यानंतर आज राज ठाकरे यांची तोफ ठाण्यात धडाडली. राज यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचे पडसाद राज्यभर उमटले. त्यांच्या त्या भाषणानंतर राज्यातील काही पक्षांतील नेत्यांच्याही विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांना उत्तर म्हणून, आज राज ठारे यांनी ही उत्तर सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे, समान नागरी कायदा करावा आणि देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा काही कायदा करावा, अशा दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत.

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, आमच्याकडे एक तुमच्याकडे पाच-पाच आम्हाला काही असुया नाही. पण या लोकसंख्येने एकदिवस देश फुटेल. यामुळे या गोष्टी होणे आवश्यक आहे.

राज म्हणाले, मी ईडीमुळे ट्रॅक बदलला, असे बोलतात, मी ईडीमुळे ट्रॅक बदलला हा गैरसमज, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. तेव्हा ज्या गोष्टींसाठी मला विरोध करायचा होता, तेव्हा मी पंतप्रधान मोदींना विरोध केला. गरज पडली तर पुन्हा करीन. पण कलम 370 रद्द केल्यानंतर, अभिनंदन करणारे पहिले ट्विट माझेच होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा पहिला माणूस मीच होतो. त्यानंतर बाकी लोक बोलले, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

नोटीशीसंदर्भात काय म्हणाले राज -आय एल अँड एफ एस नावाची कंपनी होती, मी त्यात होतो. नंतर ते झेपायचे नाही म्हणून एका वर्षात त्यातून  बाहेर पडलो. त्या कंपनीसंदर्भातील ती नोटीस होती. ती नोटीस आल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. शरद पवारांना येतेय म्हणून चाहूल लागली, तर एवढे नाटक केले. हाताने जर पाप केले नाही तर नोटीसा राजकीय असो अथवा कायदेशीर मी भीक घालत नाही." असेही राज यावेळी म्हणाले. त्यामुळे मला उद्या एखादी गोष्ट नाही पटली, तर मी परत विरोध करेन. पण उगाच विनाकारण भाषणाला उभे राहिले म्हणून, टीका करायची, असे करणार नाही. तसेच आता तुम्ही शेण खाल्ले आहे, यामुळे आता तुमच्यावर टीका करणार, असहे राज यांनी रोखठोक शब्दांत सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदी