शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ

By admin | Published: January 03, 2015 12:46 AM

गोवारीकरांच्या नजरेतून कोल्हापूरचे --विसंवाद आजही कायम...द्रष्टेपण--‘राजाराम’मध्ये चार वर्षे

कोल्हापूर : बी.एस्सी. पदवी घेतली, त्या राजाराम महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारोप सोहळ्यात त्रिवेंद्रमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालकपदी असलेले डॉ. वसंतराव गोवारीकर हे प्रमुख पाहुणे होते. १३ मार्च १९८१ रोजी झालेल्या भव्य सोहळ्यात गोवारीकर यांनी सुरेख इंग्रजीत राजाराम महाविद्यालय, विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे राजारामियन आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचे कोल्हापूर याबाबत प्रकट चिंतन केले. जागतिक किर्तीचे अवकाश शास्त्रज्ज्ञ गोवारीकर या कार्यक्रमाला येणार असल्याने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गर्दी केली होती.कोल्हापूरच्या एकंदरीत सांस्कृतिक जीवनाचा अनमोल ठेवा असलेल्या राजाराम महाविद्यालयाचा परिसर यादिवशी आजी-माजी राजारामियन्स्नी फुलून गेला होता. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, जनरल एसपीपी थोरात, विद्यापीठाचे कुलगुरू रा. कृ. कणबरकर, महापालिका आयुक्त दिलीप करंदीकर, महापौर बाबूराव पारखे, ‘राजाराम’चे प्राचार्य रा. नि. ढमढेरे, आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी डॉ. गोवारीकर यांनी शास्त्रज्ञाला शोभेल असे सुरेख इंग्रजीत प्रकट चिंतन केले. गेल्या काही वर्षांत देशाच्या विविध क्षेत्रांत झालेल्या प्रगतीला जे कारणीभूत ठरले, त्यांच्या निष्ठांचे प्रतिनिधित्व राजाराम महाविद्यालय करते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. गत काही वर्षांत तंत्रज्ञानातील विकासाचे श्रेय त्यांनी ‘राजाराम’सारख्या संस्थांना दिले. अणुसंशोधन, अवकाश-तंत्रज्ञान, शेती या सर्व क्षेत्रांतील प्रगतीमध्येही दृष्ट्या राजारामियनांचा वाटा असल्याची ग्वाही दिली. पूर्वीच्या काही लोकांनी अशा संस्था स्थापन करण्यात दूरदृष्टी दाखविली, असे द्रष्टे कोल्हापूरमध्ये होते. तंत्रज्ञानात भारत पूर्वी मागासलेला होता, पण, म्हादबा मेस्त्री व पंडितराव कुलकर्णीसारखी माणसं कोल्हापूरकरांनी निर्माण केली. (राजाराम महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवातील स्मरणिकेतील प्रा. ब. शी. कुलकर्णी यांच्या लेखातून साभार)विसंवाद आजही कायम...‘राजाराम’मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी, नव्या भारताचे एक महाकाव्य निर्माण केल्याचे मत डॉ. गोवारीकर यांनी व्यक्त केले होते. देशातील सामाजिक परिस्थितीचा ऊहापोह करताना ते म्हणाले होते की, आज एकीकडे विज्ञानाची प्रगती होते आहे, तर दुसरीकडे अंधश्रद्धा, गरिबी आणि श्रीमंतीतील दरी वाढते आहे. एका दुभंगलेल्या जगात वावरतो आहोत, पण, अशा महाविद्यालयातून बाहेर पडलेल्यांवर या दुभंगलेपणाचा परिणाम होत नाही. हा विसंवाद दूर करण्यासाठी आवश्यक दृष्टी इथे मिळालेली असते.‘राजाराम’मध्ये चार वर्षेगोवारीकर यांनी १९५८ मध्ये पी. डी. सायन्स्साठी राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी येथून बी.एस्सी. फिजिक्सची पदवीदेखील घेतली तेथून ते उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले.