शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live: 'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप
2
'बुलडोझर' कारवाईला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक; आदेशात नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या
3
"मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस", मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं कौतुक! 
4
Video: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहतीला अश्रू अनावर, अरिजीत सिंहने काय केलं पाहा; होतंय कौतुक
5
अशी सुरू झाली होती सलमान-ऐश्वर्याची लव्हस्टोरी, सोमी अली म्हणाली- "नोकरांनी सांगितलं की..."
6
'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा
7
केंद्राने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कोसळणार?
8
Innomet Advanced Materials IPO: 'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही!
9
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
10
EPFO Calculation: दर महिन्याला केवळ 'इतकं' योगदान, नंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होती ३ ते ५ कोटी; पाहा कॅलक्युलेशन
11
...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
12
Video: आर्या जाधवची अमरावतीत रॅली, सादर केलं रॅप; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद
13
IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी
14
"बिग बॉस मराठीचे चार सीझन गाजले नाहीत", केदार शिंदेंच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले- "रितेशच्या जागी..."
15
"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला
16
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
17
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी
18
NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स
19
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
20
सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू

Sambhaji Raje पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता...; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:30 PM

राजकोट किल्ल्यावरील घटनेवरून संभाजीराजे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर प्रश्नांचा भडीमार करत टीका केली आहे. 

मुंबई - वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला हे काही उत्तर नाही. या गोष्टींचा विचार याआधी व्हायला हवा होता. घाईगडबडीने जे असे निर्णय घेतले ते पोषक नाही. पुतळा उभारताना ज्या काही जाचक अटी असतात त्या सगळ्यांचा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. आता या घटनेनंतर राजकारण व्हायला लागलं आहे त्यात दुमत नाही. पूर्वी गडकोट किल्ल्यांवर न बोलणारे लोक आता बोलतायेत ही आनंदाची बाब आहे असा टोला माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

राजकोट किल्ल्यावरील घटनेनंतर संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी स्वत: गडकोट किल्ल्यांबाबत अनेक वर्ष काम करतोय. हे आंदोलन बघून मला शॉकिंग वाटलं. या निमित्ताने सगळे बोलायला लागलेत. विशालगडावरील अतिक्रमणावर मी भूमिका घेतली, सगळ्या धर्मातील लोक तिथे घुसले होते. सगळ्यांना काढा असं मी बोललो त्यावर कुणी चर्चा केली नाही. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जे प्रेम दाखवायला लागलेत ती चांगली बाब आहे असं त्यांनी विरोधकांना म्हटलं. 

तसेच गडकोट किल्ल्यांसाठी तुम्ही काय केले हे महायुती आणि महाविकास आघाडीनं सांगावे. किती पैसे खर्च केलेत? रायगड किल्ल्याबाबत मी पुढाकार घेतला त्यामुळे त्याचे जतन संवर्धन सुरू आहे. बाकी कुठल्या किल्ल्याचे सुरू आहे? काहीच नाही. ३५० वर्ष झाली, गेल्या वर्षभरात महायुती सरकारने गडकोट किल्ल्यांसाठी काय केले ते बोलावे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आजोबा जेव्हा परदेशात गेले, इटलीत त्यांचे निधन झाले. तिथे आजही त्यांची समाधी आहे. इतक्या सुंदर पद्धतीने ते सांभाळतात. इटलीचे सरकार सांभाळ करतात परंतु आपले सरकार या वास्तू का सांभाळत नाही? असा सवालही छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केला.

दरम्यान, राजकोटच्या किल्ल्यासाठी कला संचालनायलाने परवानगी दिली होती का? पुतळा उभारण्यासाठी सरकारने काही नियमावली बनवली आहे. त्यावर चर्चा व्हायला हवी. मी १२ डिसेंबर २०२३ ला पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. हा पुतळा साजेशा नाही, कामही पूर्णत्वास नाही त्यामुळे तो बदलावा अशी मागणी केली होती. दुर्दैवाने आज तो पुतळा पडला. महाराष्ट्राच्या दृष्टीने ती दुर्दैवी आहे. जे घडायला नको ते घडलेले आहे. साधा शिवाजी महाराजांचा पुतळा गावातही उभा करायचा असेल तर त्याला अनेक अटी असतात. पंतप्रधान, राष्ट्रपती उद्धाटनाला येतात तेव्हा अधिक जाचक अटी असतात, त्याचे पालन झाले का याची चौकशी होणे गरजेचे आहे असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती