शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Maharashtra Politics: “महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं”; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं कुणासोबत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 10:28 IST

Maharashtra News: लोकोपयोगी सरकार असल्याची साधी चुणूकही या शंभर दिवसात दाखवलेली नाही, असे सांगत राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीचे नवे सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत टीका केली होती. आता भाजप-शिंदे गट युतीचे नवे सरकार आल्यावर कोणासोबत जाणार, हे राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच महाविकास आघाडीत जाणे म्हणजे असंगाशी संग करणे होय, अशी घणाघाती टीकाही राजू शेट्टी यांनी केली. 

राजू शेट्टी नक्की महाविकास आघाडी की युतीचा (Yuti) भाग असणार याची चर्चा सुरु होती. त्यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजू शेट्टी यांनी कुणाशीही युती किंवा आघाडी न करता ‘एकला चलो रे’ची भूमिका त्यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीत जाणे म्हणजे असंगाशी संग करणे होय, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. 

आम्ही स्वतंत्रपणे दोन्ही आघड्यापासून दूर राहणार

निवडणुका लढवणे किंवा राजकारण करणे हा आमचा धंदा नाही. शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी, वेगवेगळ्या सभागृहात प्रतिनिधी पाठवण्यासाठी आम्ही असंगाशी संग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यात आम्हाला चांगले अनुभव आला नाही. त्यामुळे यापुढे आम्ही महाविकास आघाडी किंवा भाजप यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतंत्रपणे दोन्ही आघड्यापासून दूर राहत कार्य करणार, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे बोलतात

कोणत्याही सरकारचे १०० दिवसात परीक्षण करता येत नाही. या सरकारने आपण लोकोपयोगी सरकार असल्याची साधी चुणूकही या शंभर दिवसात दाखवलेली नाही. सरकार दहीहंडीत गोविंदा, गणपतीमध्ये डॉल्बीबाबत जी तत्परता दाखवली ती शेतकऱ्यांबाबत का दाखवत नाही, असा सवाल करत महाराष्ट्रात ऊस वगळता एकही पीक अतिवृष्टीमुळे शिल्लक राहिले नाही. मात्र कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे बोलतात, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. तसेच सध्याची परिस्थिती ओल्या दुष्काळाच्या निकषात बसत नसेल तर निकष बदला. वैश्विक तापमान वाढीमुळे सगळे ऋतू बदललेले आहेत. त्यामुळे बदलत्या काळाप्रमाणे तुम्ही तुमची धोरण बदलली नाहीत तर उपयोग काय? मात्र हे सर्व निकष, धोरण हे मदत देण्यासाठी आहे की टाळण्यासाठी हे सरकारने सांगावे, अशी विचारणा राजू शेट्टी यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी