शहरं
Join us  
Trending Stories
1
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
2
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
3
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
4
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
5
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
6
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
7
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
8
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
9
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
10
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
11
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान
12
High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश?
13
नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...
14
तारीख ठरली; 5 जुलै रोजी लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
15
PHOTOS : आई, प्रसिद्ध प्रेजेंटेटर अन् सेलिब्रेटी! बुमराहच्या पत्नीने दाखवले 'छोटेसे जीवन'
16
संस्कार आपापले! मोदी आणि राहुल गांधींच्या संसदेतील वर्तनाची तुलना करत भाजपाने लगावला टोला
17
“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत
18
“राज्यातील भ्रष्ट महायुतीला हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा”: रमेश चेन्नीथला
19
Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार
20
काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंनी दिलगिरीचे पत्र दिले; म्हणाले, सभागृहातही तयारी....

राजू शेट्टी यांचे ठरले! विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ जागा लढणार, लवकरच ठिकाणे ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 5:17 PM

Raju Shetti News: शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी प्रश्नांवरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Raju Shetti News: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात भाष्य केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की,  शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही. कोल्हापूर-नागपूर या महामार्गाला हा समांतर महामार्ग आहे. मग या महामार्गाची गरज काय? समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला, त्याच्या केवळ ४० टक्के मोबदला मिळणार आहे. राज्यात चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही. सर्व पक्षीय नेत्याच्या भूमिकेवर संशय आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 

विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ ठिकाणी लढणार

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ३० ते ३५ जागा लढू शकतो. परंतु त्या कुठून लढवायच्या याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. राज्यात एका दिवशी २५० शेतकरी आत्महत्या होत आहे. हरितक्रांती चे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या गावातही शेतकरी आत्महत्या झाली. हे या महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 

दरम्यान, सरकारने कापूस, सोयाबीन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी समजून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. कर्जबाजारी शेतकरी देश सोडून पळून जात नाही तर जीवन जगणे सोडून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. केंद्र व राज्य सरकार कोट्यवधी रुपयांच्या योजनांची घोषणा करतात. सामान्य माणसाचे जीएसटीचे पैसे जमा आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी