शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

भाजप-शिवसेनेकडून जनमताचा अपमान, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 18:30 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकार स्थापन करण्यास चालढकल करत असलेल्या भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील जनतेने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्टपणे बहुमत दिल्यानंतर त्यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष म्हणजे जनतेचा अपमान असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.नवी दिल्ली येथे गुरुवारी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेनंतर शेट्टी बोलत होते. युतीने निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री आणि मंत्रीपदांबाबत निर्णय घेणे आवश्यक होते. सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांना आवश्यक जागा मिळाल्यानंतर सुरू असलेले मतभेद त्यांच्या उणीवा दाखवून देणारे आहे, असेही शेट्टी म्हणाले. महाराष्ट्रात झालेली निवडणूक कोणत्याही मुद्द्याशिवाय लढली गेली. शेतकºयांच्या मुद्द्यावर विचार करायला कोणालाही वेळ नव्हता. महाराष्ट्रात महापुरामुळे जवळपास २५ टक्के शेतकरी हैराण झालेले आहेत. मान्सूननंतर परतीच्या पावसामुळे विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे न केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून विम्याची रक्कम मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करवून घेण्याची जबाबदारी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची होती. मात्र, फडणवीस यांना केवळ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळेल की नाही याची काळजी होती. कोणत्याही राजकीय पक्षाचे याकडे लक्ष नसने हे दुर्दैवी असल्याचे शेट्टी म्हणाले. एकाच टप्प्यात निवडणुका झाल्यामुळे विरोधकांना फटका बसल्याचेही शेट्टी म्हणाले. हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आमची लढाई सुरूच राहणार आहे, असेही शेट्टी म्हणाले. ‘आरसीईपी’मुळे दूध उत्पादकांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडवरून दूध पावडर आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्याला संपविणारा ठरेल. मुक्त व्यापार पद्धतीद्वारे दूध पावडर आयात केल्याने दूधाचा भाव २२ रुपये लीटरवर येईल त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असा दावाही शेट्टी यांनी केला.    ३७०चा मुद्दा सत्ताधाऱ्यांवर उलटला!केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जत येथे कलम ३७०च्या मुद्द्यावर भाषण केल्यामुळे विलास जगताप या उमेदवाराचा पराभव झाला. जनतेला पिण्यासाठी पाणी नसताना शहा यांनी ३७०चे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि उमेदवाराला फटका बसला. या मुद्द्यामुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ३७०मुळे भाजपच्या उमेदवारांना फटका बसल्याचा दावा शेट्टी यांनी केला. विरोधकांचा सेनेला पाठिंबा?काँग्रेस, राष्ट्रवादीने सेनेला पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. काही मुद्द्यांवर चर्चा शिल्लक आहे. मात्र, शिवसेनेने भाजपसमोर शरणागती पत्करल्यामुळे विरोधकांची नीति अपयशी ठरण्याची शक्यता असल्याचेही शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण