शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शेतमालाला दीडपट हमीभाव द्या - राजू शेट्टी

By admin | Published: July 10, 2017 4:48 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करू शकणार नाहीत, असे भाकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी किसान मुक्ती यात्रेदरम्यान झालेल्या सभेत वर्तविले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ६ ते १८ जुलै अशी मध्य प्रदेशातील मंदसौर येथून किसान मुक्ती यात्रा निघाली आहे. रविवारी यात्रा धुळ्यात आली. जय किसान आंदोलनाचे योगेंद्र यादव, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक डॉ़ सुनिलम, संयोजक व्ही़एम़सिंह, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. रविवारी सकाळी शहादा (जि. नंदुरबार) येथे सभा झाली. धुळ्यात शेतकरी संघटनेचे नेते रवी देवांग यांनी रस्त्यालगत उभे राहून यात्रेला हात दाखवून थांबवले़ प्रतिभा शिंदे, योगेंद्र यादव यांनी रवी देवांग यांच्याशी चर्चा करून निवेदन स्वीकारले़ जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यात बदलाची गरज शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी मांडलेली खुल्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आम्हालाही मान्य आहे, पण त्यासाठी कायद्यात बदलासह अनेक अडथळे आहेत. खुल्या व्यवस्थेसाठी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदलाची गरज आहे़, असे शेट्टी यांनी सांगितले.