शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

Rajya Sabha Election: मुदत संपली! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली; शिवसेना-भाजपात थेट लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 3:13 PM

आता अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून आता चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं आता येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेची उमेदवारी मागे घ्या विधान परिषदेची जागा सोडू असा प्रस्ताव दोन्हीकडून एकमेकांना देण्यात आला. परंतु राज्यसभेची उमेदवारी मागे न घेण्यावर मविआ आणि भाजपा ठाम राहिल्याने काहीही तोडगा निघू शकला नाही. 

आता अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या राजकारणात दोन्ही बाजूने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करत आहेत. आमच्याकडे तिसऱ्या उमेदवारासाठी ३० मते जादा आहेत. त्यामुळे आता अपक्ष, इतर पक्षांच्या मदतीवर आम्ही तिसरा उमेदवार निवडून आणू असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच इतर पक्षाच्या कुठल्याही आमदारांशी आमचा संपर्क नाही. ही आमची कार्यपद्धती नाही. पक्षाच्या आमदाराला प्रतोदाला मत दाखवावे लागते. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष, छोट्या पक्षातील मतांवर गणित आहे. ही निवडणूक भाजपा जिंकणारच आहे. कायदेशीर अडचणी आल्या तरी काहीजण भाजपाला मतदान करणार असेल तर त्यांना मदत करू असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले परंतु त्याला यश मिळालं नाही त्यामुळे १० जून रोजी या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार आहे. 

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील - शिवसेना

घोडेबाजार रोखण्याचा महाविकास आघाडीने प्रयत्न केला. शिवसेनेचा दुसरा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार असून महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचा उमेदवार निवडून येईलच. सामोपचाराने मार्ग निघाला असता तर दोघांसाठी चांगले होते. आमची पूर्ण तयारी आहे. आम्ही निवडणुकीला घाबरतोय असं नाही. केंद्रात तुमचं सरकार तसे महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी अपक्ष, इतर पक्षातील आमदारांशी कामे केल्यानं हे आमच्यासोबत आहे. आता यांना फूस लावण्याचे, केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावण्याचे प्रकार आमच्या कानावर आले आहेत. आम्ही आमचं काम करत राहू. निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच आमदारांना पळवण्याची वेळ कुणावरही येणार नाही. असे प्रयत्नही कुणी करू नये. गुप्त मतदान असल्याने क्रॉस व्होटिंग होते. यावेळी तसे नाही. त्यामुळे पक्षाची मते फुटणार नाहीत. आमच्याकडे लहान पक्ष, अपक्षांच्या मतांची आकडेवारी आहे. निवडणुका म्हटल्यावर बैठका होतात. अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. विरोधी पक्ष सरकार अस्थिर करण्याचा अनेक प्रयत्न करत आहेत. खेचाखेची व्हावी, आमिष दाखवण्याची संधी मिळावी यासाठी भाजपाचं राजकारण सुरू आहे. लोकशाहीत या सर्वाला सामोरं जायचं असतं असंही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा